शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

९४३ पुल, ३६ बोगदे, ३० वर्षांनी काश्मीरमध्ये धावणार वंदे भारत; ६ तासांचा प्रवास ३ तासात शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:11 IST

Vande Bharat Train Jammu Kashmir: एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदी या वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते. परंतु, अचानक कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.

Vande Bharat Train Jammu Kashmir: अल्पावधीतच लोकप्रिय झालेली भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. संपूर्ण देशातील विविध मार्गांवर वंदे भारत ट्रेनची यशस्वी धाव सुरू आहे. परंतु, काश्मीरमध्ये अद्यापपर्यंत वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नव्हती. एप्रिलमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी कटरा ते श्रीनगर या मार्गावरील वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करणार होते. परंतु, तो कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला होता. आता ६ जून २०२५ रोजी पंतप्रधान मोदी वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवू शकतात, असा कयास बांधला जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगर आणि कटरा दरम्यान रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे काश्मीर रेल्वेने जोडले जाईल. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे जम्मू आणि श्रीनगरमधील प्रवासाचा वेळ बराच कमी होईल. काश्मीर खोऱ्यातील रेल्वे सेवा फक्त बारामुल्ला ते सांगलदान या मार्गादरम्यान मर्यादित आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस कटरा ते श्रीनगर आणि बारामुल्लापर्यंत थेट जाईल. अद्यापपर्यंत या मार्गावर कोणतीही थेट ट्रेन नव्हती. पूर्वी रस्त्याने हा प्रवास करण्यासाठी ६ ते ७ तास लागायचे. आता वंदे भारत एक्स्प्रेसमुळे हा प्रवास ३ तासांत पूर्ण करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

कोणती स्थानके घेणार? वेळापत्रक काय असणार?

ही वंदे भारत ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावेल. ती कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटेल आणि श्रीनगरला सकाळी ११.२० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हीच वंदे भारत ट्रेन श्रीनगरहून दुपारी १२.४५ वाजता निघेल आणि कटरा येथे दुपारी ३.५५ वाजता पोहोचेल. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकवरून वंदे भारत ट्रेन धावेल. रियासी, सांगलदान, बनिहाल, काजीगुंड, अनंतनाग आणि अवंतीपोरा या स्थानकांवर थांबेल. यामुळे या ठिकाणी प्रवास करणे सोपे होईल. वंदे भारत एक्स्प्रेस चिनाब पुलावरून जाईल. त्यामुळे या प्रवासाचे हेही एक प्रमुख आकर्षण मानले जात आहे. 

दरम्यान, कटरा ते श्रीनगर या मार्गाचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी असू शकतो, असे म्हटले जात आहे. या मार्गावर ३६ बोगदे आहेत. रेल्वे मार्गावर ९४३ पूल आहेत. १६४ किमीचा प्रवास बोगदे आणि पुलांमधून केला जाईल. कटरा-रियासी या मार्गावर देशातील पहिला रेल्वे केबल स्टे ब्रिज बांधण्यात आला आहे. भूकंप, वादळ किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास, त्याच्या नियंत्रण कक्षाकडून तात्काळ अलर्ट जारी केला जाईल. गरज पडल्यास, ट्रेन मध्येच थांबवता येणे शक्य होणार आहे. रामबन जिल्ह्यातील खारी - सुंबड मार्गादरम्यान देशातील सर्वांत लांब १२.७७ किमी लांबीचा बोगदा आहे.

 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Railwayभारतीय रेल्वे