शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

९० गाड्यांचा वेग रेल्वेने वाढविला

By admin | Updated: October 25, 2015 04:07 IST

भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११०

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११० मिनिटांची बचत होणार आहे.भारतातील रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे असली तरीही तिचा वेग फारच कमी आहे. जगभरातील रेल्वेगाड्यांनी गेल्या काही दशकांत आपल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला असला तरीही भारतात मात्र तसा वाढविण्यात आला नाही. भारतीय रेल्वे अजूनही ताशी ५० ते ५२ कि. मी. वेगाने धावते.या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत प्रथमच ९० गाड्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८९ एक्स्प्रेस आणि सवारी गाड्यांचा वेग प्रतितास पाच कि. मी.ने वाढवून ६० कि.मी. प्रतितास केला जाणार आहे. प्रवासास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेग वाढविण्यात येणारे अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग ताशी १५० कि. मी. आहे. तो आणखी सात कि. मी.ने वाढविण्यात आला आहे.गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ८९ गाड्यांचा वेग वाढविण्यात आल्याने १० ते ११० मिनिटांची बचत झाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास पाहता हे खूप मोठे यश आहे. मार्ग कमी व गाड्या जास्त यामुळे खरे तर गाड्यांचा वेग कमी झाला होता. हावड्याहून निघणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेगही केवळ १० कि. मी. प्रतितासाने वाढविला आहे. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. ते पाहता नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आल्याने २५ मिनिटांची, तर नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा वेग वाढविल्याने तब्बल ११० मिनिटांची बचत झाली आहे. मुंबई-अहमदाबाद गाडीचा वेग वाढल्याने २५ मिनिटे कमी लागतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)