शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

९० गाड्यांचा वेग रेल्वेने वाढविला

By admin | Updated: October 25, 2015 04:07 IST

भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११०

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत ९० रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला आहे. त्यात तीन राजधानी आणि दोन शताब्दी गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेत १० ते ११० मिनिटांची बचत होणार आहे.भारतातील रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची रेल्वे असली तरीही तिचा वेग फारच कमी आहे. जगभरातील रेल्वेगाड्यांनी गेल्या काही दशकांत आपल्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढविला असला तरीही भारतात मात्र तसा वाढविण्यात आला नाही. भारतीय रेल्वे अजूनही ताशी ५० ते ५२ कि. मी. वेगाने धावते.या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने गेल्या ४० वर्षांत प्रथमच ९० गाड्यांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ८९ एक्स्प्रेस आणि सवारी गाड्यांचा वेग प्रतितास पाच कि. मी.ने वाढवून ६० कि.मी. प्रतितास केला जाणार आहे. प्रवासास लागणारा कालावधी कमी करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेग वाढविण्यात येणारे अडथळे, तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरणार्थ भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेग ताशी १५० कि. मी. आहे. तो आणखी सात कि. मी.ने वाढविण्यात आला आहे.गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या नवीन वेळापत्रकानुसार ८९ गाड्यांचा वेग वाढविण्यात आल्याने १० ते ११० मिनिटांची बचत झाली आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास पाहता हे खूप मोठे यश आहे. मार्ग कमी व गाड्या जास्त यामुळे खरे तर गाड्यांचा वेग कमी झाला होता. हावड्याहून निघणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचा वेगही केवळ १० कि. मी. प्रतितासाने वाढविला आहे. नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. ते पाहता नवी दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यात आल्याने २५ मिनिटांची, तर नांदेड-पुणे एक्स्प्रेसचा वेग वाढविल्याने तब्बल ११० मिनिटांची बचत झाली आहे. मुंबई-अहमदाबाद गाडीचा वेग वाढल्याने २५ मिनिटे कमी लागतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)