शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

९७५ बालकांची तस्करांच्या तावडीतून सुटका

By admin | Updated: December 4, 2014 00:47 IST

मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या ९७५ बालकांची सुटका करण्यात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे यश आले आहे.

नवी दिल्ली : मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या ९७५ बालकांची सुटका करण्यात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाला रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे यश आले आहे. या बालकांचे पुनर्वसन करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडे पाठपुरावाही केला जात आहे. दिल्ली, केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर ही कारवाई मागील साडेतीन वर्षांत झाली. यंदाच्या मार्च महिन्यात दिल्ली रेल्वेस्थानकावर ४४५ बालकांची सुटका केल्याने हा विषय पुन्हा प्रकाशात आला. २०११ पासून आतापर्यंत ९० घटनांमध्ये एकट्या दिल्ली पोलिसांना ४४५ बालकांना वाचविण्यात यश आले व २९० आरोपींना अटक करण्यात आली. दिल्ली रेल्वेस्थानकात झालेल्या बचाव अभियानातून मानवी तस्करीसाठी नेण्यात येणाऱ्या बालकांना वाचविण्यात पोलिसांना यश आले होते. त्यावरून देशभरात बालके याकामी नेणाऱ्यांच्या टोळ््या किती आहेत, पोलीस व राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने कोणती पावले उचलली, या खा. विजय दर्डा यांनी राज्यसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहराज्यमंत्री हरीभाई चौधरी यांनी उत्तर दिले. चौधरी म्हणाले, राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडे साडेतीन वर्षांत ६४ तक्रारी दाखल झाल्या असून ५५ प्रकरणांच्या सुनावण्या झाल्या आहेत. नऊ प्रकरणांच्या सुनावण्या सुरू आहेत. झारखंड, बिहार, प. बंगाल व केरळात मानवी तस्करीसाठी या बालकांचा वापर होणार होता. आयोगाने केलेले प्रयत्न व पोलिसांचे अभियान याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी सविस्तर माहिती दिली. (विशेष प्रतिनिधी)