शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

८९ टक्के साक्षर वायनाडने राहुल गांधींना का निवडले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 18:27 IST

साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना ३०० चा टप्पा पार केला. तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील आपल्या पारंपरिक अमेठीतून मतदार संघात पराभव पत्करावा लागला. परंतु, वायनाडमधूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राहुल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

अमेठीतून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांची जेवढी चर्चा झाली, त्या तुलनेत वायनाडमधील त्यांच्या मताधिक्याकडे गांभीर्याने पहिले गेले नाही. नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना राहुल यांचा वायनाड मतदारसंघ अचानक चर्चेत आला आहे. साक्षरता आणि येथे असलेली विविध धर्मांची आकडेवारी यामुळे वायनाड चर्चेत आले आहे. यामध्ये साक्षरता मुद्दा अधिक गाजत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमधून तब्बल ७ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. तर त्यांचे मताधिक्य चार लाखांच्या घरात आहे. मात्र चर्चा आहे, की वायनाडमध्ये ८९ टक्के साक्षर जनता असून त्यांनी राहुल गांधी यांना निवडून दिले. येथील जातीची समीकरणे पाहिल्यास, वायनाड जिल्ह्यात ५० टक्के हिंदू, २८ टक्के मुस्लीम आणि २१ टक्के ख्रिश्चन आहेत. मात्र ही आकडेवारी मतदार संघाची नसून जिल्ह्याची आहे. त्यामुळे यावर शंका आहे.

दरम्यान 'डेटा नेट' या वेबसाईटनुसार वायनाड मतदार संघात हिंदू, मुस्लीम अनुक्रमे ४० आणि ४५ टक्के आहेत. तर १५ टक्के ख्रिश्चन आहेत. त्यामुळे सात लाख मते घेणाऱ्या राहुल यांना साक्षर मतदारांचे मते मिळालेच शिवाय हिंदू आणि मुस्लीम दोघांची मते मिळाल्याचे स्पष्ट होते. यावरून आश्चर्य याचे व्यक्त होते की, साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

वाराणसीत ७७ टक्के साक्षरता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली. या मतदार संघाचे मोदी दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. वाराणसीमधून मोदींनी तब्बल ६ लाख ७४ हजार ६६४ मते घेतली. याच वारणसीत साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के आहे. मात्र ८९ टक्केच साक्षर असलेल्या केरळमध्ये भाजपला इतर राज्यांच्या तुलनेत फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे कमी साक्षरता असलेल्या मतदार संघात भाजपला लाभ तर होत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.