शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

८९ टक्के साक्षर वायनाडने राहुल गांधींना का निवडले ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 18:27 IST

साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

- रवींद्र देशमुख

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाने शानदार कामगिरी करताना ३०० चा टप्पा पार केला. तर एनडीएला ३५० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना देखील आपल्या पारंपरिक अमेठीतून मतदार संघात पराभव पत्करावा लागला. परंतु, वायनाडमधूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राहुल यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

अमेठीतून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांची जेवढी चर्चा झाली, त्या तुलनेत वायनाडमधील त्यांच्या मताधिक्याकडे गांभीर्याने पहिले गेले नाही. नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेत असताना राहुल यांचा वायनाड मतदारसंघ अचानक चर्चेत आला आहे. साक्षरता आणि येथे असलेली विविध धर्मांची आकडेवारी यामुळे वायनाड चर्चेत आले आहे. यामध्ये साक्षरता मुद्दा अधिक गाजत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वायनाडमधून तब्बल ७ लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. तर त्यांचे मताधिक्य चार लाखांच्या घरात आहे. मात्र चर्चा आहे, की वायनाडमध्ये ८९ टक्के साक्षर जनता असून त्यांनी राहुल गांधी यांना निवडून दिले. येथील जातीची समीकरणे पाहिल्यास, वायनाड जिल्ह्यात ५० टक्के हिंदू, २८ टक्के मुस्लीम आणि २१ टक्के ख्रिश्चन आहेत. मात्र ही आकडेवारी मतदार संघाची नसून जिल्ह्याची आहे. त्यामुळे यावर शंका आहे.

दरम्यान 'डेटा नेट' या वेबसाईटनुसार वायनाड मतदार संघात हिंदू, मुस्लीम अनुक्रमे ४० आणि ४५ टक्के आहेत. तर १५ टक्के ख्रिश्चन आहेत. त्यामुळे सात लाख मते घेणाऱ्या राहुल यांना साक्षर मतदारांचे मते मिळालेच शिवाय हिंदू आणि मुस्लीम दोघांची मते मिळाल्याचे स्पष्ट होते. यावरून आश्चर्य याचे व्यक्त होते की, साक्षरतेत आघाडीवर असलेल्या वायनाडने राहुल गांधी यांना निवडले. तसेच भविष्यातील १०० टक्के साक्षर भारतात राहुल गांधींना पसंती मिळणार याचे तर है धोतक नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. 

वाराणसीत ७७ टक्के साक्षरता

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढवली. या मतदार संघाचे मोदी दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत आहेत. वाराणसीमधून मोदींनी तब्बल ६ लाख ७४ हजार ६६४ मते घेतली. याच वारणसीत साक्षरतेचे प्रमाण ७५ टक्के आहे. मात्र ८९ टक्केच साक्षर असलेल्या केरळमध्ये भाजपला इतर राज्यांच्या तुलनेत फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे कमी साक्षरता असलेल्या मतदार संघात भाजपला लाभ तर होत नाही, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.