शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Tauktae Cyclone: ताैक्तेचे ८६ बळी; ओएनजीसीचे तीन कार्यकारी संचालक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 06:06 IST

ताैक्ते चक्रीवादळातही काम सुरू ठेवल्यामुळे बॉम्बे हायमध्ये असंख्य लोक अडकून पडले होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने ६२८ जणांची सुटका केली होती.

मुंबई : अरबी समुद्रात आलेल्या ताैक्ते चक्रीवादळाच्या काळात मुंबईजवळील समुद्रातील तेल क्षेत्र ‘बॉम्बे हाय’मधील घटनाक्रमाची चौकशी सुरू असून त्याअंतर्गत तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) तीन कार्यकारी संचालकांना निलंबित करण्यात आले आहे. बॉम्बे हायमधील ८६ कामगारांचा चक्रीवादळात बळी गेला असून अधिकाऱ्यांनी वादळाच्या पूर्वसूचनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.ताैक्ते चक्रीवादळातही काम सुरू ठेवल्यामुळे बॉम्बे हायमध्ये असंख्य लोक अडकून पडले होते. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने ६२८ जणांची सुटका केली होती.निलंबित करण्यात आलेले तीन वरिष्ठ अधिकारी अनुक्रमे ड्रिलिंग, सुरक्षा आणि शोध मोहीम विभागांचे प्रमुख आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंतच्या काळासाठी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नियुक्त केलेली समिती या घटनेची चौकशी करीत आहे. बॉम्बे हायच्या इतिहासातील  चक्रीवादळामुळे घडलेली ही सर्वांत मोठी दुर्घटना ठरली आहे. सूत्रांनी सांगितले की, स्टॉर्म जिओ या खाजगी संस्थेने वादळ निकट आल्याचा इशारा दिला होता. वादळामुळे समुद्राची पातळी ७ ते ९ मीटरने वाढणार असल्याचेही इशाऱ्यात म्हटले होते. याची माहिती पी३०५ डेक अधिकाऱ्याने वरिष्ठांना कळवून पुढील आदेश मागितले होते. तथापि, अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून अनेकांचा जीव धोक्यात घातला, असे पुरावे चौकशी समितीसमोर आले आहेत.दरम्यान, तेल क्षेत्रातील अधिकाऱ्यांची संघटना ‘असोसिएशन ऑफ सायन्टिफिक अँड टेक्निकल ऑफिर्स’ने (आस्टो) निलंबनाच्या कारवाईस आक्षेप घेतला आहे. या दुर्घटनेस कंत्राटदार कंपनी मे. ॲफकॉन्स जबाबदार असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.