शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 13:44 IST

अधिकाऱ्यांनी जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित करून तिची पेन्शन बंद केली.

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित करून तिची पेन्शन बंद केली. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे हे प्रकरण राजस्थानमधील अजमेरचे आहे. अजमेर जिल्ह्यातील एका गावात आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या 85 वर्षीय गट्टू देवी यांना जेव्हा कळलं की तिला मृत घोषित केल्यानंतर सरकारकडून मिळणारं पेन्शन बंद करण्यात आलं आहे, तेव्हा तिला धक्काच बसला. 

अजमेरच्या तोडगड तहसीलच्या बंजारी गावातील रहिवासी असलेल्या आजीला फेब्रुवारी 2022 मध्ये अखेरचे 1,500 रुपये पेन्शन मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम येणे बंद झाले. त्यांचा मुलगा चुन्नीलाल म्हणाला, "गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे पेन्शनचे पैसे येत आहेत, असे वाटल्याने आम्ही खाते तपासले नाही. मी पंचायत समितीत गेलो असता माझ्या आईला मृत घोषित करण्यात आले असून गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच पेन्शन बंद करण्यात आल्याचे आढळले."

सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला असून ही चूक कशी झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान, विभागाने गट्टू देवीची ओळख पडताळली असून उर्वरित पेन्शनचे पैसे पुढील महिन्यात दिले जातील, असे सांगितले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीने पडताळणी न करता गट्टू देवी यांना मृत घोषित केले.

मुलाने सांगितले की पंचायतीला मृत घोषित करण्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि त्याशिवाय सिस्टम अपडेट करणे अशक्य आहे. मात्र, मृतांच्या यादीत माझ्या आईचे नावही नव्हते. बायोमेट्रिक ओळखीसाठी गट्टू देवी आपल्या मुलासोबत ई-मित्र केंद्रातही गेल्या होत्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ते म्हणाले, "आम्ही तीन-चार वेळा केंद्रात गेलो, पण वृद्धत्वामुळे त्यांच्या बोटांचे ठसे घेता आले नाहीत." मात्र, ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते शांत झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन