शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

एप्रिलमध्ये ८२ लाख मोबाइल ग्राहक घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:19 IST

लॉकडाऊनचा परिणाम : भारती एअरटेलला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मोबाइल ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे ग्राहक शहरी भागातील आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या गळतीचा सर्वाधिक फटका एअरटेलला बसला असून, जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झाली आहे.भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण (ट्राय)ने याबाबतच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून मोबाइल-धारकांच्या संख्येतील मोठी घट स्पष्ट होत आहे. या महिन्यामध्ये स्थलांतरित कामगार शहरांमधून मोठ्या संख्येने गावी निघून गेल्याने शहरी भागातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या सुमारे ८२ लाखांनी कमी झाली आहे. मात्र याच काळामध्ये ग्रामीण भागातील वापरकर्त्यांची संख्या थोड्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.मार्च महिन्याच्या अखेरीस देशातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या ११७७.९७ दशलक्ष होती. ती एप्रिल अखेर ०.७२ टक्क्यांनी कमी होऊन ११६९.४४ दशलक्ष झाली आहे. शहरी भागातील वापरकर्ते ६५६.४६ दशलक्षांवरून ६४७.१९ दशलक्षांवर आले आहेत. याच काळामध्ये ग्रामीण भागातील वापरकर्ते ५२१.५१ दशलक्षांवरून ५२२.२४ दशलक्ष झाले आहेत.या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरांमधून ग्रामीण भागाकडे स्थलांतर झालेले असल्याने शहरी भागातील टेलिडेन्सिटी कमी झाली तर ग्रामीण भागातील डेन्सिटी वाढलेली दिसून येत आहे. या काळामध्ये उत्तर प्रदेश या एकाच राज्यामधील वापरकर्त्यांची संख्या वाढलेली दिसून आली.कुठे ग्राहकांमध्ये घट, तर कुठे झाली वाढएप्रिल महिन्यामध्ये भारती एअरटेलचे ५.२ दशलक्ष ग्राहक कमी झाले असून, ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ व्होडाफोन, आयडियाचा क्रमांक लागत असून, त्यांचे ४.५ दशलक्ष ग्राहक घटले आहेत. या पार्श्वभूमीवर जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली आहे. एप्रिल महिन्यात जिओचे १.६ दशलक्ष ग्राहक वाढलेले आहेत.

टॅग्स :Airtelएअरटेल