शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एप्रिलमध्ये ८२ लाख मोबाइल ग्राहक घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:19 IST

लॉकडाऊनचा परिणाम : भारती एअरटेलला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मोबाइल ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे ग्राहक शहरी भागातील आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात वाढ दिसून येत आहे. या गळतीचा सर्वाधिक फटका एअरटेलला बसला असून, जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झाली आहे.भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरण (ट्राय)ने याबाबतच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून मोबाइल-धारकांच्या संख्येतील मोठी घट स्पष्ट होत आहे. या महिन्यामध्ये स्थलांतरित कामगार शहरांमधून मोठ्या संख्येने गावी निघून गेल्याने शहरी भागातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या सुमारे ८२ लाखांनी कमी झाली आहे. मात्र याच काळामध्ये ग्रामीण भागातील वापरकर्त्यांची संख्या थोड्या प्रमाणात वाढलेली दिसून येते.मार्च महिन्याच्या अखेरीस देशातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या ११७७.९७ दशलक्ष होती. ती एप्रिल अखेर ०.७२ टक्क्यांनी कमी होऊन ११६९.४४ दशलक्ष झाली आहे. शहरी भागातील वापरकर्ते ६५६.४६ दशलक्षांवरून ६४७.१९ दशलक्षांवर आले आहेत. याच काळामध्ये ग्रामीण भागातील वापरकर्ते ५२१.५१ दशलक्षांवरून ५२२.२४ दशलक्ष झाले आहेत.या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर शहरांमधून ग्रामीण भागाकडे स्थलांतर झालेले असल्याने शहरी भागातील टेलिडेन्सिटी कमी झाली तर ग्रामीण भागातील डेन्सिटी वाढलेली दिसून येत आहे. या काळामध्ये उत्तर प्रदेश या एकाच राज्यामधील वापरकर्त्यांची संख्या वाढलेली दिसून आली.कुठे ग्राहकांमध्ये घट, तर कुठे झाली वाढएप्रिल महिन्यामध्ये भारती एअरटेलचे ५.२ दशलक्ष ग्राहक कमी झाले असून, ही संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ व्होडाफोन, आयडियाचा क्रमांक लागत असून, त्यांचे ४.५ दशलक्ष ग्राहक घटले आहेत. या पार्श्वभूमीवर जिओच्या ग्राहकांमध्ये मात्र वाढ झालेली दिसून आली आहे. एप्रिल महिन्यात जिओचे १.६ दशलक्ष ग्राहक वाढलेले आहेत.

टॅग्स :Airtelएअरटेल