शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

मोदी-शाहांवर नामुष्की! 'ते' ८०० हिंदू पाकिस्तानात परतले; भारताकडून मोठा अपेक्षाभंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 16:22 IST

'त्या' ८०० हिंदूंना पाकिस्तानला जावं लागलं; पाकिस्ताननं भारताची बदनामी करण्यासाठी वापरलं

 जयपूर/नवी दिल्ली: भारताकडून नागरिकत्व न मिळाल्यानं पाकिस्तानातून आलेले ८०० हिंदू नागरिक पुन्हा पाकिस्तानला गेले आहेत. भारताकडून अपेक्षाभंग झाल्यानं हिंदू नागरिकांवर पाकिस्तानला परतण्याची वेळ आली. सीमांत लोक संघटनेनं ही माहिती दिली. या प्रकरणी ऑनलाईन यंत्रणेचा आढावा घेतला जात असल्याची माहिती गृह मंत्रालयानं दिली.

शेजारच्या देशांमध्ये असलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येईल अशी घोषणा मोदी सरकारनं केली होती. त्यामुळे अत्याचार सहन करत असलेले पाकिस्तानातील शेकडो नागरिक भारतात आले. यातील जवळपास ८०० पाकिस्तानी हिंदू पुन्हा पाकिस्तानाल गेले आहेत. हे नागरिक २०२१ मध्ये भारतात आले होते. भारताचं नागरिकत्व लवकर मिळेल अशी आशा त्यांना होती. मात्र कित्येक महिने उलटूनही नागरिकत्व न मिळाल्यानं ८०० पाकिस्तानी हिंदूंना पुन्हा पाकिस्तानला जावं लागलं. हे ८०० हिंदू नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून राजस्थानात राहत होते.

नागरिकत्वासाठी अर्ज करूनही कित्येक महिने काहीच न झाल्यानं ८०० नागरिक पाकिस्तानला परत केले. ते परतल्यावर पाकिस्तानच्या यंत्रणांनी त्यांचा भारताविरोधात वापर केला. त्यांना माध्यमांसमोर आणण्यात आलं. भारतात अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचं त्यांच्याकडून वदवून घेण्यात आलं, अशी माहिती सीमांत लोक संघटनेचे अध्यक्ष हिंदू सिंह सोधा यांनी दिली.

शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी मोदी सरकारनं २०१८ मध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बुद्धिस्ट यांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यासाठी गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, हरयाणा आणि पंजाबमधील १३ जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले होते.