शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 13:19 IST

देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत

ठळक मुद्देइंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेतज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतातकिंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात

बेंगळुरू, दि. 2 - देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे.दरवर्षी इंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या कॉलेजमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात व सलग पाच वर्षे ज्या कॉलेजेसमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्या जात नाहीत, अशी कॉलेजं बंद व्हायला हवीत असा या शिखर संस्थेचा नियम आहे.बेंगळूरमध्ये एका कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी सहस्त्रबुद्धे आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाईटनुसार 2014-15 ते 2017-18 या कालावधीत देशभरातील सुमारे 410 इंजिनीअरिंग कॉलेजना बंद करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यातील 20 संस्था कर्नाटकमधील आहेत. 2016-17 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमधल्या संस्था जास्त प्रमाणात आहेत, ज्यांनी टप्प्या टप्प्याने कॉलेज बंद करण्याची अनुमती एआयसीटीईकडे मागितली आहे.

राज्यनिहाय खासगी इंजिनीअरिंग कॉलेजे, जी बंद होऊ इच्छितात

तेलंगणा - 64महाराष्ट्र - 59उत्तर प्रदेश - 47तामिळनाडू - 31हरयाणा - 31राजस्थान - 30आंध्र प्रदेश - 29गुजरात - 29 कर्नाटक - 21मध्य प्रदेश - 21पंजाब - 19

ज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात. टप्प्या टप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेता येणे. कॉलेजेचचा दर्जा, शिक्षणाचा नोकरी मिळण्यासाठी होणारा उपयोग ही या कॉलेजसमोरची महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हा ही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी विद्यादानाचे काम करतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील असे इंजिनीअर घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.