शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 13:19 IST

देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत

ठळक मुद्देइंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेतज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतातकिंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात

बेंगळुरू, दि. 2 - देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे.दरवर्षी इंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या कॉलेजमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात व सलग पाच वर्षे ज्या कॉलेजेसमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्या जात नाहीत, अशी कॉलेजं बंद व्हायला हवीत असा या शिखर संस्थेचा नियम आहे.बेंगळूरमध्ये एका कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी सहस्त्रबुद्धे आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाईटनुसार 2014-15 ते 2017-18 या कालावधीत देशभरातील सुमारे 410 इंजिनीअरिंग कॉलेजना बंद करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यातील 20 संस्था कर्नाटकमधील आहेत. 2016-17 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमधल्या संस्था जास्त प्रमाणात आहेत, ज्यांनी टप्प्या टप्प्याने कॉलेज बंद करण्याची अनुमती एआयसीटीईकडे मागितली आहे.

राज्यनिहाय खासगी इंजिनीअरिंग कॉलेजे, जी बंद होऊ इच्छितात

तेलंगणा - 64महाराष्ट्र - 59उत्तर प्रदेश - 47तामिळनाडू - 31हरयाणा - 31राजस्थान - 30आंध्र प्रदेश - 29गुजरात - 29 कर्नाटक - 21मध्य प्रदेश - 21पंजाब - 19

ज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात. टप्प्या टप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेता येणे. कॉलेजेचचा दर्जा, शिक्षणाचा नोकरी मिळण्यासाठी होणारा उपयोग ही या कॉलेजसमोरची महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हा ही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी विद्यादानाचे काम करतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील असे इंजिनीअर घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.