शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील 800 दर्जाहीन इंजिनीअरिंग कॉलेजेस मोजताहेत शेवटच्या घटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 13:19 IST

देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत

ठळक मुद्देइंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेतज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतातकिंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात

बेंगळुरू, दि. 2 - देशभरातली जवळपास 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची इच्छा ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) ने व्यक्त केली आहे. या संस्थांमधल्या प्रवेशांची संख्या दरवर्षी घटत असून तिथल्या जागाही भरल्या जात नाहीत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल दत्तात्रय सहस्त्रबुद्धे यांनी देशभरातील सुमारे 800 इंजिनीअरिंगची कॉलेजेस बंद करण्याची गरज व्यक्त केली आहे.दरवर्षी इंजिनीअरिंगची सुमारे 150 कॉलेजेस एआयसीटीईच्या कडक नियमांमुळे स्वत:हून बंद पडत आहेत. ज्या कॉलेजमध्ये आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसतात व सलग पाच वर्षे ज्या कॉलेजेसमध्ये 30 टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्या जात नाहीत, अशी कॉलेजं बंद व्हायला हवीत असा या शिखर संस्थेचा नियम आहे.बेंगळूरमध्ये एका कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी सहस्त्रबुद्धे आले असता त्यांनी ही माहिती दिली आहे. एआयसीटीईच्या वेबसाईटनुसार 2014-15 ते 2017-18 या कालावधीत देशभरातील सुमारे 410 इंजिनीअरिंग कॉलेजना बंद करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. यातील 20 संस्था कर्नाटकमधील आहेत. 2016-17 मध्ये सगळ्यात जास्त संख्येने या शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरयाणा, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांमधल्या संस्था जास्त प्रमाणात आहेत, ज्यांनी टप्प्या टप्प्याने कॉलेज बंद करण्याची अनुमती एआयसीटीईकडे मागितली आहे.

राज्यनिहाय खासगी इंजिनीअरिंग कॉलेजे, जी बंद होऊ इच्छितात

तेलंगणा - 64महाराष्ट्र - 59उत्तर प्रदेश - 47तामिळनाडू - 31हरयाणा - 31राजस्थान - 30आंध्र प्रदेश - 29गुजरात - 29 कर्नाटक - 21मध्य प्रदेश - 21पंजाब - 19

ज्यांना व्यवस्थितपणे संस्था चालवता येत नाही, ते एकतर टप्प्या टप्प्याने बंद करण्याची परवानगी मागतात किंवा कॉलेजचे रुपांतर पॉलीटेक्निकमध्ये किंवा विज्ञान अथवा कला शाखेच्या कॉलेजमध्ये करतात. टप्प्या टप्प्याने बंद करणे म्हणजे प्रथम वर्षात प्रवेश देणे बंद करणे परंतु कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या आधीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षांचे शिक्षण घेता येणे. कॉलेजेचचा दर्जा, शिक्षणाचा नोकरी मिळण्यासाठी होणारा उपयोग ही या कॉलेजसमोरची महत्त्वाची आव्हाने आहेत. प्राध्यापकांचे कौशल्य हा ही चिंतेचा विषय आहे. पुरेसा अनुभव नसलेले प्राध्यापक अनेक ठिकाणी विद्यादानाचे काम करतात. थेट उद्योगांमध्ये काम करण्यास पात्र ठरू शकतील असे इंजिनीअर घडवणे हे एआयसीटीईचे उद्दिष्ट्य असून त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.