शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बिहारमध्ये प्रसादातून विषबाधा, ८० जणांची तब्येत बिघडली, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 08:53 IST

Munger Food Poisoning : प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या

मुंगेर : बिहारमधील मुंगेरमध्ये जवळपास ८० लोकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील धरहरा भागातील नक्षलग्रस्त कोठवा गावातील आहे. याठिकाणी लोक भगवान सत्यनारायण (Satyanarayan Puja) पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

या पूजेनंतर प्रसाद लोकांना वाटण्यात आला. प्रसाद खाल्यानंतर जवळपास ८० लोकांची तब्येत बिघडली. प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि लोकांना मदत करण्यास सुरवात केली. 

दरम्यान,  धरहरा भागातील कोठवा गावात राहणारे महेश कोडा यांच्या घरी भगवान सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूजा कार्यक्रमात दलित, महादलित आणि आदिवासी समाजातील शेकडो लोकांनीही भाग घेतला. पूजा संपल्यानंतर सर्वांना खाण्यासाठी प्रसाद देण्यात आला. 

प्रसाद खाल्यानंतर लोकांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. हे सर्व पाहून ग्रामीण डॉक्टरांना तातडीने बोलावून दाखविण्यात आले, मात्र काही ग्रामस्थांची प्रकृती बिघडू लागल्यावर ग्रामस्थांनी लडैयाताड पोलीस आणि धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविले. 

या घटनेची माहिती मिळताच लडैयाताड पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या टीमसह कोठवा गावात पोहोचले आणि सर्व आजारी लोकांवर उपचार सुरू केले. प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या 15 जणांनी प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यBiharबिहारfood poisoningअन्नातून विषबाधा