शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

बिहारमध्ये प्रसादातून विषबाधा, ८० जणांची तब्येत बिघडली, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 08:53 IST

Munger Food Poisoning : प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या

मुंगेर : बिहारमधील मुंगेरमध्ये जवळपास ८० लोकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील धरहरा भागातील नक्षलग्रस्त कोठवा गावातील आहे. याठिकाणी लोक भगवान सत्यनारायण (Satyanarayan Puja) पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

या पूजेनंतर प्रसाद लोकांना वाटण्यात आला. प्रसाद खाल्यानंतर जवळपास ८० लोकांची तब्येत बिघडली. प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि लोकांना मदत करण्यास सुरवात केली. 

दरम्यान,  धरहरा भागातील कोठवा गावात राहणारे महेश कोडा यांच्या घरी भगवान सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूजा कार्यक्रमात दलित, महादलित आणि आदिवासी समाजातील शेकडो लोकांनीही भाग घेतला. पूजा संपल्यानंतर सर्वांना खाण्यासाठी प्रसाद देण्यात आला. 

प्रसाद खाल्यानंतर लोकांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. हे सर्व पाहून ग्रामीण डॉक्टरांना तातडीने बोलावून दाखविण्यात आले, मात्र काही ग्रामस्थांची प्रकृती बिघडू लागल्यावर ग्रामस्थांनी लडैयाताड पोलीस आणि धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविले. 

या घटनेची माहिती मिळताच लडैयाताड पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या टीमसह कोठवा गावात पोहोचले आणि सर्व आजारी लोकांवर उपचार सुरू केले. प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या 15 जणांनी प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यBiharबिहारfood poisoningअन्नातून विषबाधा