शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बिहारमध्ये प्रसादातून विषबाधा, ८० जणांची तब्येत बिघडली, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 08:53 IST

Munger Food Poisoning : प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या

मुंगेर : बिहारमधील मुंगेरमध्ये जवळपास ८० लोकांना प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील धरहरा भागातील नक्षलग्रस्त कोठवा गावातील आहे. याठिकाणी लोक भगवान सत्यनारायण (Satyanarayan Puja) पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

या पूजेनंतर प्रसाद लोकांना वाटण्यात आला. प्रसाद खाल्यानंतर जवळपास ८० लोकांची तब्येत बिघडली. प्रसादातून विषबाधा झाल्याने लोकांना उलटी आणि मळमळ होऊन अस्वस्थ वाटायला लागले. या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि लोकांना मदत करण्यास सुरवात केली. 

दरम्यान,  धरहरा भागातील कोठवा गावात राहणारे महेश कोडा यांच्या घरी भगवान सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पूजा कार्यक्रमात दलित, महादलित आणि आदिवासी समाजातील शेकडो लोकांनीही भाग घेतला. पूजा संपल्यानंतर सर्वांना खाण्यासाठी प्रसाद देण्यात आला. 

प्रसाद खाल्यानंतर लोकांना पोटदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. हे सर्व पाहून ग्रामीण डॉक्टरांना तातडीने बोलावून दाखविण्यात आले, मात्र काही ग्रामस्थांची प्रकृती बिघडू लागल्यावर ग्रामस्थांनी लडैयाताड पोलीस आणि धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविले. 

या घटनेची माहिती मिळताच लडैयाताड पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या टीमसह कोठवा गावात पोहोचले आणि सर्व आजारी लोकांवर उपचार सुरू केले. प्रसाद खाल्ल्यानंतर आजारी पडलेल्या 15 जणांनी प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून धरहरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यBiharबिहारfood poisoningअन्नातून विषबाधा