शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरात २४ तासांत ८ अतिरेकी ठार; भारतीय जवानांनी ठोकलं 'शतक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:53 IST

दोन चकमकींचे यश : आयईडीचा स्फोट घडविण्याचा कट उधळला गेला; यावर्षी १०० अतिरेकी संपवले

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींत आणखी सहा अतिरेकी मारले गेले. यामुळे मारल्या गेलेल्यांची संख्या आता ८ झाली आहे. शुक्रवारी दोन अतिरेकी पुलवामा चकमकीत आणि चार अतिरेकी शोपियानमधील कारवाईत मारले गेले, असे अधिकारी म्हणाला.दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या पॅम्पोर भागातील मीज येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी गुरुवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. त्या भागाला त्यांनी घेरल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात एक अतिरेकी मारला गेला, तर इतर दोन अतिरेकी जवळच्या मशिदीत शिरले. संपूर्ण रात्रभर मशिदीभोवती सुरक्षादलाचे कर्मचारी होते. शुक्रवारी सकाळी सुरक्षादलांनी अतिरेकी बाहेर यावेत म्हणून अश्रुधूर सोडला. मशिदीचे पावित्र्य राखत सुरक्षादलांनी दोन अतिरेक्यांना ठार मारले.या कारवाईत एकूण तीन अतिरेकी मारले गेले. अतिरेकी मशिदीबाहेर यावेत यासाठी ना गोळीबार केला गेला ना आयईडीचा वापर, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. संयम आणि व्यावसायिकता कामाला आली. गोळीबार किंवा आयईडीचा वापर न करता फक्त अश्रुधुराचा वापर केला. मशिदीचे पावित्र्य राखले गेले. मशिदीत लपलेले दोन्ही अतिरेकी मारले गेले, असे कुमार म्हणाले. शोपियानच्या मुनंद-बंदपावा भागात गुरुवारी सुरू केलेल्या अतिरेकीविरोधी कारवाईत शुक्रवारी सकाळी चार अतिरेकी मारले गेले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. या भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना शोधण्यात आले. २४ तासांत एकूण ८ अतिरेकी दोन चकमकींत मारले गेले. यावर्षी एकूण १०० अतिरेक्यांना सुरक्षादलांनी ठार मारले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला. हे खतरनाक अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तयबाशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमाराजम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी कोणतेही कारण नसताना तोफमारा केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे अधिकारी म्हणाला. सकाळी १०.४५ वाजता पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांतून नौशेरा सेक्टरमध्ये (राजौरी जिल्हा) मारा केला.नियंत्रण रेषेवरील जंगलात आगजम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील मानकोटे सेक्टरमध्ये जंगलात लागलेल्या मोठ्या आगीमुळे भूसुरुंगांचे स्फोट झाले, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षादलांनी जमिनीत हे सुरुंग पेरून ठेवलेले होते.आमच्याकडे अतिरेकी आयईडीने हल्ले करणार असल्याची माहिती आली होती. पाकिस्तानी जैशचा कमांडर अदनान आणि कुलगाममध्ये वाहीद भाई होते. त्यांनी काही घातपात करायच्या आधीच आम्ही त्यांना नष्ट केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर