शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

जम्मू-काश्मिरात २४ तासांत ८ अतिरेकी ठार; भारतीय जवानांनी ठोकलं 'शतक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:53 IST

दोन चकमकींचे यश : आयईडीचा स्फोट घडविण्याचा कट उधळला गेला; यावर्षी १०० अतिरेकी संपवले

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन स्वतंत्र चकमकींत आणखी सहा अतिरेकी मारले गेले. यामुळे मारल्या गेलेल्यांची संख्या आता ८ झाली आहे. शुक्रवारी दोन अतिरेकी पुलवामा चकमकीत आणि चार अतिरेकी शोपियानमधील कारवाईत मारले गेले, असे अधिकारी म्हणाला.दक्षिण काश्मीरमधील पुलवामाच्या पॅम्पोर भागातील मीज येथे अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी गुरुवारी सकाळी त्यांचा शोध सुरू केला. त्या भागाला त्यांनी घेरल्यानंतर अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात एक अतिरेकी मारला गेला, तर इतर दोन अतिरेकी जवळच्या मशिदीत शिरले. संपूर्ण रात्रभर मशिदीभोवती सुरक्षादलाचे कर्मचारी होते. शुक्रवारी सकाळी सुरक्षादलांनी अतिरेकी बाहेर यावेत म्हणून अश्रुधूर सोडला. मशिदीचे पावित्र्य राखत सुरक्षादलांनी दोन अतिरेक्यांना ठार मारले.या कारवाईत एकूण तीन अतिरेकी मारले गेले. अतिरेकी मशिदीबाहेर यावेत यासाठी ना गोळीबार केला गेला ना आयईडीचा वापर, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले. संयम आणि व्यावसायिकता कामाला आली. गोळीबार किंवा आयईडीचा वापर न करता फक्त अश्रुधुराचा वापर केला. मशिदीचे पावित्र्य राखले गेले. मशिदीत लपलेले दोन्ही अतिरेकी मारले गेले, असे कुमार म्हणाले. शोपियानच्या मुनंद-बंदपावा भागात गुरुवारी सुरू केलेल्या अतिरेकीविरोधी कारवाईत शुक्रवारी सकाळी चार अतिरेकी मारले गेले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. या भागात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना शोधण्यात आले. २४ तासांत एकूण ८ अतिरेकी दोन चकमकींत मारले गेले. यावर्षी एकूण १०० अतिरेक्यांना सुरक्षादलांनी ठार मारले आहे. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला. हे खतरनाक अतिरेकी हिज्बुल मुजाहिद्दीन आणि लष्कर- ए- तयबाशी संबंधित आहेत. (वृत्तसंस्था)राजौरी जिल्ह्यात पाककडून तोफमाराजम्मू : पाकिस्तानी लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर शुक्रवारी कोणतेही कारण नसताना तोफमारा केला. भारतीय लष्करानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले, असे अधिकारी म्हणाला. सकाळी १०.४५ वाजता पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून छोट्या शस्त्रांतून आणि उखळी तोफांतून नौशेरा सेक्टरमध्ये (राजौरी जिल्हा) मारा केला.नियंत्रण रेषेवरील जंगलात आगजम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेवरील मानकोटे सेक्टरमध्ये जंगलात लागलेल्या मोठ्या आगीमुळे भूसुरुंगांचे स्फोट झाले, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानकडून घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षादलांनी जमिनीत हे सुरुंग पेरून ठेवलेले होते.आमच्याकडे अतिरेकी आयईडीने हल्ले करणार असल्याची माहिती आली होती. पाकिस्तानी जैशचा कमांडर अदनान आणि कुलगाममध्ये वाहीद भाई होते. त्यांनी काही घातपात करायच्या आधीच आम्ही त्यांना नष्ट केले, असे विजय कुमार यांनी सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर