शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

गावात एकाचवेळी ८ जणांवर अंत्यसंस्कार, गावकऱ्यांचे डोळे पाणावले; घरी चूलही पेटली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 13:38 IST

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे

मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कोंडावत गावात एका भीषण दुर्घटनेने शोककळा पसरली आहे. शुक्रवारी याठिकाणी ८ मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात जेव्हा एकत्र ८ तिरड्या उठल्या तेव्हा प्रत्येकाचे डोळे हे दृश्य पाहून पाणावले. कुटुंबासह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. कुणाच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले तर कुणी आपला भाऊ गमावला. काही कुटुंबाचा घरातील एकुलता एक आधार गेला. 

गावात एकाही घरात चूल पेटली नाही

कोंडावत गावात कुणाच्याही घरी चूल पेटली नाही. गुरुवारी झालेल्या दुर्घटनेत ८ जणांचे जीव गेले. या घटनेमुळे खंडवा जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. स्वच्छता करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या ८ जणांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला. या सर्वांना खंडवा जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला आणले. पोस्टमोर्टमनंतर ८ जणांचे मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केले.

कशी घडली दुर्घटना?

गावात देवी मातेचे विसर्जन होणार होते. परंपरेनुसार हे विसर्जन गावातील एका विहिरीत केले जाते. सुरुवातीला ३ जण विहिरीत उतरले होते परंतु जेव्हा ते बुडायला लागले तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी आणखी ५ जणांनी विहिरीत उडी घेतली. दुर्दैवाने ते सगळे आतच अडकले आणि सर्वांचा मृत्यू झाला. विहिरीतील विषारी वायूमुळे या सर्वांचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. या दुर्घटनेत राकेश पटेल, वासूदेव पटेल, अर्जुन पटेल, गजानन पटेल, मोहन पटेल, अजय पटेल, शरण पटेल, अनिल पटेल यांचा मृत्यू झाला आहे.

प्रत्येक कुटुंबाला ४ लाख मदतीची घोषणा

या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मृत कुटुंबाच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रूपये देण्याची घोषणा केली आहे. दु:खाच्या या प्रसंगी माझ्या सहवेदना कुटुंबाच्यासोबत आहेत. या दुर्घटनेतील मृतांना ईश्वर चिरशांती देवो आणि कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळो असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश