शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

यंदा लैंगिक अत्याचाराच्या सर्वाधिक ७८० तक्रारी- रेखा शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:49 IST

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची माहिती; मीटू चळवळीमुळे जागृती

पुणे : विशाखा मार्गदर्शक तत्त्वानुसार तीन वर्षांपूर्वी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ’ हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशभरातून महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात दरवर्षी जवळपास ५५० च्या आसपास तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे येत होत्या. मात्र यंदाच्या वर्षी दहा महिन्यांतच आयोगाकडे सुमारे ७८० तक्रारी आल्या आहेत. यावर्षी तक्रारींचे प्रमाण २०० ने वाढले असल्याची माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.तीन वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधात तक्रार करण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समिती कार्यान्वित करणे बंधनकारक आहे. मात्र आजही बºयाच कार्यालय आणि संस्थांमध्ये अशा अंतर्गत समित्या स्थापन करण्यात आलेल्या नाहीत. ही समिती स्थापन केलीच नसेल तर महिलांनी आवाज कुणाकडे उठवायचा, दाद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याकरिताच आम्ही महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाला ही सूचना केली आहे, की मंत्रालयासह प्रत्येक शासकीय, निमशासकीय, तसेच खासगी संस्था, कंपन्या यामध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे सक्तीचे करा. तसे झाल्यास महिलांना मोकळेपणाने आपले म्हणणे मांडता येईल आणि संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल. सरकारी धोरणात कितीही बदल केला किंवा कायदे केले तरी जोपर्यंत समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत धोरणांचा काहीही उपयोग नाही. कुटुंबामध्येच आईवडील मुलीच्या हातात बाहुली देतात आणि तिला लग्नाची स्वप्ने दाखविली जातात. पण लग्न ही खरंच इतकी महत्त्वाची गोष्ट आहे? तिला स्वत:च्या पायावर उभे केले तर हुंडाबळी किंवा कौटुंबिक हिंसाचारांसारख्या घटनांना तिला सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे ‘मीटू’ नव्हे, तर ‘नो मोअर,’ ‘आता बास’ असे म्हणण्याची वेळ असल्याचे त्या म्हणाल्या.देशभरात ‘मीटू’ चळवळीने एक वादळ निर्माण केले आहे. पण ही चळवळ सुरू होण्याआधीही आयोगाकडे महिलांच्या तक्रारी येतच होत्या. कारण यापूर्वी कधी ना कधी प्रत्येकाबरोबर हे घडलं आहे. त्यामध्ये प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. त्यामुळे आज त्या बोलत आहेत असे म्हणता येणार नाही. ‘मीटू’ चळवळीनंतर महिलांना बोलायचे असेल किंवा तक्रार करायची असेल, तर आम्ही एक मेल आयडी जाहीर केला होता. त्यावर ज्या पूर्वीच सोशल मीडियावर व्यक्त झाल्या आहेत, अशा महिलांच्या आठ ते दहा तक्रारी राष्ट्रीय महिला आयोगाकडे आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. - रेखा शर्मा

टॅग्स :Metoo CampaignमीटूLokmat Women Summit 2018लोकमत विमेन समिट २०१८