शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी ७७ वर्षीय महिलेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 01:55 IST

उत्तर प्रदेशस्थित साहिबाबाद येथील रहिवासी राजकुमार त्यागी या महिलेने तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्याबद्दल याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : कायद्याचे शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या ७७ वर्षीय महिलेने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. एलएलबीचे शिक्षण घेण्यासाठी ३० वयोमर्यादा ठरविल्यामुळे तिने बार कौन्सिल आॅफ इंडियाच्या (बीसीआय) नव्या नियमाला आव्हान दिले आहे.उत्तर प्रदेशस्थित साहिबाबाद येथील रहिवासी राजकुमार त्यागी या महिलेने तीन वर्षांच्या एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्याबद्दल याचिका दाखल केली आहे. बीसीआयच्या नियमांना आधीच आव्हान देण्यात आले असून, प्रलंबित असलेल्या विषयात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची तिने मागणी केली आहे. बीसीआयच्या नियमांनुसार, पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी अधिकतम वय २० वर्षे व तीनवर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अधिकतम वयोमर्यादा ३० वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. याचिकेत म्हटले आहे की, पतीच्या मृत्यूनंतर संपत्ती वाचवण्यासाठी तिला कायदेशीर अडचणी समोर येत आहेत, त्यामुळे या महिलेला कायद्याचे शिक्षण घेण्यात रुची निर्माण झाली. संबंधित महिलेकडे कोणताही वकील नसल्यामुळे तिला सर्व प्रकारची कायदेशीर जटिलता स्वत:च समजून घ्यावी लागत आहे.मूलभूत हक्क- बीसीआयचे नियम संविधानाच्या कलम १४ (कायद्यासमोर समानता), १९(१)(जी) (कोणताही व्यवसाय किंवा वृत्तीचा अधिकार) व २१ (व्यक्तिगत स्वातंत्र्य व जीवनाचे रक्षण) याचे उल्लंघन करीत आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.- वृद्ध महिलेने म्हटले आहे की, मला माझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये किंवा शिक्षण संस्थेमध्ये विधिचे शिक्षण घेण्याचा मौलिक अधिकार प्राप्त आहे व संविधानाचे कलम २१ त्याचे संरक्षण करीत आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय