शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

ईशान्येतील हिंसाचारापैकी ७७% घटना मणिपूरमध्ये; २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये घटना वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:46 IST

ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या.

नवी दिल्ली : २०२३ या वर्षात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारापैकी ७७ टक्के घटना या एकट्या मणिपूरमध्ये घडल्या होत्या असे केंद्रीय गृह खात्याने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. मणिपूरमध्ये २०२२च्या तुलनेत २०२३ साली हिंसक घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले, असे या अहवालात म्हटले आहे. 

ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या. ३ मे २०२३ रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचाराचा भडका उडाला. त्यामुळे असंख्य लोक मारले गेले, जखमी झाले आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. 

गृह खात्याने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ हालचाली केल्या. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या अतिरिक्त कंपन्या तसेच हेलिकॉप्टर आणि ड्रोन मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले. 

घडले ते खेदजनक, पण स्थिती सुधारेल- मणिपूरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होत आहे. नवीन वर्षात राज्यातील परिस्थिती पूर्ववत होईल, अशी मला आशा आहे. .- मणिपूरमध्ये जे घडले ते खेदजनक आहे. या वांशिक संघर्षात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. लोकांना आपले घरदार सोडावे लागले. या सर्व गोष्टींबद्दल मी जनतेची माफी मागत आहे, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी म्हटले.२५०हून अधिक लोकांचा मृत्यू - गेल्या २० महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षात राज्यातील गोळीबाराच्या घटनांमध्ये आता घट झाली आहे. मे ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ४०८ गोळीबाराच्या घटना घडल्या. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत ३४५ वेळा गोळीबार झाला. - मणिपूरमध्ये अधूनमधून हिंसक घटना घडत असतात. त्या राज्यात मे २०२३पासून आजवर झालेल्या वांशिक हिंसाचारात २५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार