शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ईशान्येतील हिंसाचारापैकी ७७% घटना मणिपूरमध्ये; २०२२च्या तुलनेत २०२३मध्ये घटना वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:46 IST

ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या.

नवी दिल्ली : २०२३ या वर्षात ईशान्य भारतातील राज्यांमध्ये झालेल्या हिंसाचारापैकी ७७ टक्के घटना या एकट्या मणिपूरमध्ये घडल्या होत्या असे केंद्रीय गृह खात्याने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. मणिपूरमध्ये २०२२च्या तुलनेत २०२३ साली हिंसक घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे सुरक्षा दलाचे जवान व नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले, असे या अहवालात म्हटले आहे. 

ईशान्य भारतात २०२३मध्ये २४३ हिंसक घटना घडल्या. त्यातील १८७ घटना मणिपूरमध्ये झाल्या. ३ मे २०२३ रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये वांशिक हिंसाचाराचा भडका उडाला. त्यामुळे असंख्य लोक मारले गेले, जखमी झाले आणि जाळपोळीच्या घटनाही घडल्या. 

गृह खात्याने म्हटले आहे की, मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ हालचाली केल्या. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, लष्कर आणि आसाम रायफल्सच्या अतिरिक्त कंपन्या तसेच हेलिकॉप्टर आणि ड्रोन मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले. 

घडले ते खेदजनक, पण स्थिती सुधारेल- मणिपूरमध्ये हळूहळू शांतता प्रस्थापित होत आहे. नवीन वर्षात राज्यातील परिस्थिती पूर्ववत होईल, अशी मला आशा आहे. .- मणिपूरमध्ये जे घडले ते खेदजनक आहे. या वांशिक संघर्षात अनेकांनी आपले प्रियजन गमावले. लोकांना आपले घरदार सोडावे लागले. या सर्व गोष्टींबद्दल मी जनतेची माफी मागत आहे, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी म्हटले.२५०हून अधिक लोकांचा मृत्यू - गेल्या २० महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्षात राज्यातील गोळीबाराच्या घटनांमध्ये आता घट झाली आहे. मे ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ४०८ गोळीबाराच्या घटना घडल्या. नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत ३४५ वेळा गोळीबार झाला. - मणिपूरमध्ये अधूनमधून हिंसक घटना घडत असतात. त्या राज्यात मे २०२३पासून आजवर झालेल्या वांशिक हिंसाचारात २५०हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार