शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पश्चिम बंगालमध्ये ओबीसी यादीत ७७ पैकी ७५ मुस्लीम जाती; सुप्रीम कोर्टात काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:11 IST

पश्चिम बंगाल सरकारचं हे प्रतिज्ञापत्र हैराण करणारे होते. ज्यात ७७ पैकी ७५ मुस्लीम समुदायातील जातींचा ओबीसीत समावेश करण्यावरून आरोप होत आहेत

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत ७७ जातींचा ओबीसीत समावेश करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगितले आहे. हा निर्णय तीन टप्प्यातील प्रक्रियेद्वारे घेतला गेला, ज्यात २ सर्व्हे आणि मागासवर्गीय आयोगाच्या सुनावणीचाही समावेश आहे. मात्र काही मुस्लीम समुहातील प्रकरणात २४ तासांपेक्षा कमी कालावधीत प्रक्रिया पूर्ण केल्याचीही कबुली सरकारने दिली आहे.

बंगाल सरकार कारभारावर प्रश्नचिन्ह

खोट्टा मुस्लीम समुदायाने १३ नोव्हेंबर २००९ मध्ये अर्ज दिला होता. त्याच दिवशी पश्चिम बंगाल मागासवर्गीय आयोगाने त्यांची ओबीसी यादीत समावेश करण्याची शिफारस केली. त्याप्रकारे मुस्लीम जमादार समुदायाचा अर्ज आला त्याच दिवशी २१ एप्रिल २०१० रोजी त्यांचा यादीत समावेश करण्याची शिफारस करण्यात आली. सरकारी कामकाज आणि वेगवान प्रक्रियेवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. गायेन, भाटिया मुस्लीम समुदायांचाही यादीत समावेश करण्याची शिफारस केवळ एका दिवसात केली, त्याशिवाय मुस्लीम चुतोर मिस्त्री समुदायासाठी ४ दिवस आणि १२ हून अधिक अन्य मुस्लीम समुदायाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी १ महिन्यापेक्षा कमी कालावधी लागला. 

७७ पैकी ७५ मुस्लीम जाती

पश्चिम बंगाल सरकारचं हे प्रतिज्ञापत्र हैराण करणारे होते. ज्यात ७७ पैकी ७५ मुस्लीम समुदायातील जातींचा ओबीसीत समावेश करण्यावरून आरोप होत आहेत. काही प्रकरणी समुदायाच्या सदस्यांद्वारे आयोगासमोर ओबीसी यादीत समावेश करण्याचा अर्ज दाखल होण्यापूर्वीच समुदायाचे उपवर्गीकरण सर्व्हे करण्यात आले होते. काही मुस्लीम समुदाय जसं काजी, कोटल, हजारी, लायक यासाठी २०१५ मध्ये सर्व्हे करण्यात आला होता. मात्र त्यानंतर बऱ्याच कालावधीनं त्यांचे अर्ज दाखल झाले. 

सुप्रीम कोर्टाने मागितले उत्तर

राज्याने सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील खंडपीठाच्या आदेशावर उत्तर देताना म्हटलं की, ओबीसी यादीत समावेश करण्याबाबत वापरण्यात आलेल्या प्रक्रियेची माहिती मागवण्यात आली होती. त्यात केवळ एक सविस्तर तपासणीनंतर आणि तोंडी अथवा दस्तावेज पडताळणी केल्यानंतर विचार करण्यात आला. ३४ समुदायातील प्रत्येकावर आयोगाद्वारे अंतिम शिफारशीसह एक रिपोर्ट तयार करण्यात आला होता. 

सर्व्हे कसा केला?, सुप्रीम कोर्टाचा सवाल

५ ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला २०१० आणि २०१२ या काळात ७७ जातींचा ओबीसीत समावेश केल्याच्या प्रक्रियेचा खुलासा मागितला होता. कोलकाता हायकोर्टाने ओबीसी समुदायात समाविष्ट जातींचा कुठलीही शहानिशा न केल्यानंतर सरकारचा निर्णय रद्द केला होता. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचे आदेश रद्द करण्यास नकार दिला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयOBCअन्य मागासवर्गीय जातीwest bengalपश्चिम बंगाल