शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

74 टक्के भारतीयांना वाटतं आपला देश योग्य मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 13:32 IST

एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देजवळपास 26 देशांमधील नागरिक ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे.चीनमधील 87 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे. 

नवी दिल्ली, दि. 14 - 74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे. एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. जवळपास 26 देशांमधील नागरिक या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भारतासहित चीन आणि सौदी अरेबियामधील नागरिक आपल्या देशाच्या वाटचालीवर सर्वात जास्त सकारात्मक असल्याचं पहायला मिळालं. 

ग्लोबल रिसर्च मार्केटच्या फर्मने हा सर्व्हे केला आहे. दर महिन्याला हा सर्व्हे करण्यात येतो. एकीकडे नागरिक सकारात्मक दिसत असताना दुसरीकडे आपला देश चुकीच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं वाटणा-यांची संख्याही जास्त आहे. 

चीनमधील 87 टक्के लोकांनी आपला देश योग्य मार्गावर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर भारतामध्ये 74 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे. 

अमेरिका, युके, स्विडन, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियादेखील या सर्व्हेत सहभागी झाले होते. या देशांमधील 50 टक्के नागरिक आपल्या देशाच्या कामकाजावर खूश नसून, त्यांनी वाटचालीवर नाराजी व्यक्त केली आहे. बेकारी, राजकीय / आर्थिक भ्रष्टाचार, गरिबी आणि सामाजिक विषमता या प्रमुख समस्या असल्याचं सर्व्हेत सहभागी देशाच्या नागरिकांनी सांगितलं आहे.

भारतीयांनीही आपल्या प्रमुख्य समस्यांची माहिती दिली असून यामध्ये भ्रष्टाचार, बेकारी आणि गुन्हेगारीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. चीनमधील नागरिकांनीही हवामान आणि बेकारी मुख्य चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. तर सौदीमधील नागरिकांनी बेकारी, दहशतवादी आणि कर या गोष्टी प्रामख्याने सतावत असल्याची माहिती दिली आहे.