शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

74 टक्के भारतीयांना वाटतं आपला देश योग्य मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 13:32 IST

एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देजवळपास 26 देशांमधील नागरिक ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे.चीनमधील 87 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे. 

नवी दिल्ली, दि. 14 - 74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे. एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. जवळपास 26 देशांमधील नागरिक या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भारतासहित चीन आणि सौदी अरेबियामधील नागरिक आपल्या देशाच्या वाटचालीवर सर्वात जास्त सकारात्मक असल्याचं पहायला मिळालं. 

ग्लोबल रिसर्च मार्केटच्या फर्मने हा सर्व्हे केला आहे. दर महिन्याला हा सर्व्हे करण्यात येतो. एकीकडे नागरिक सकारात्मक दिसत असताना दुसरीकडे आपला देश चुकीच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं वाटणा-यांची संख्याही जास्त आहे. 

चीनमधील 87 टक्के लोकांनी आपला देश योग्य मार्गावर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर भारतामध्ये 74 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे. 

अमेरिका, युके, स्विडन, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियादेखील या सर्व्हेत सहभागी झाले होते. या देशांमधील 50 टक्के नागरिक आपल्या देशाच्या कामकाजावर खूश नसून, त्यांनी वाटचालीवर नाराजी व्यक्त केली आहे. बेकारी, राजकीय / आर्थिक भ्रष्टाचार, गरिबी आणि सामाजिक विषमता या प्रमुख समस्या असल्याचं सर्व्हेत सहभागी देशाच्या नागरिकांनी सांगितलं आहे.

भारतीयांनीही आपल्या प्रमुख्य समस्यांची माहिती दिली असून यामध्ये भ्रष्टाचार, बेकारी आणि गुन्हेगारीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. चीनमधील नागरिकांनीही हवामान आणि बेकारी मुख्य चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. तर सौदीमधील नागरिकांनी बेकारी, दहशतवादी आणि कर या गोष्टी प्रामख्याने सतावत असल्याची माहिती दिली आहे.