शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

74 टक्के भारतीयांना वाटतं आपला देश योग्य मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 13:32 IST

एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे

ठळक मुद्देजवळपास 26 देशांमधील नागरिक ऑनलाइन सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे.चीनमधील 87 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे. 

नवी दिल्ली, दि. 14 - 74 टक्के भारतीयांना आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचा विश्वास वाटत आहे. एका ऑनलाइन सर्व्हेमधून ही माहिती समोर आली आहे. जवळपास 26 देशांमधील नागरिक या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी भारतासहित चीन आणि सौदी अरेबियामधील नागरिक आपल्या देशाच्या वाटचालीवर सर्वात जास्त सकारात्मक असल्याचं पहायला मिळालं. 

ग्लोबल रिसर्च मार्केटच्या फर्मने हा सर्व्हे केला आहे. दर महिन्याला हा सर्व्हे करण्यात येतो. एकीकडे नागरिक सकारात्मक दिसत असताना दुसरीकडे आपला देश चुकीच्या मार्गाने वाटचाल करत असल्याचं वाटणा-यांची संख्याही जास्त आहे. 

चीनमधील 87 टक्के लोकांनी आपला देश योग्य मार्गावर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर भारतामध्ये 74 टक्के आणि सौदी अरेबियामधील 71 टक्के नागरिकांनी आपला देश योग्य वाटचाल करत असल्याचं सांगितलं आहे. 

अमेरिका, युके, स्विडन, फ्रान्स, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलियादेखील या सर्व्हेत सहभागी झाले होते. या देशांमधील 50 टक्के नागरिक आपल्या देशाच्या कामकाजावर खूश नसून, त्यांनी वाटचालीवर नाराजी व्यक्त केली आहे. बेकारी, राजकीय / आर्थिक भ्रष्टाचार, गरिबी आणि सामाजिक विषमता या प्रमुख समस्या असल्याचं सर्व्हेत सहभागी देशाच्या नागरिकांनी सांगितलं आहे.

भारतीयांनीही आपल्या प्रमुख्य समस्यांची माहिती दिली असून यामध्ये भ्रष्टाचार, बेकारी आणि गुन्हेगारीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला आहे. चीनमधील नागरिकांनीही हवामान आणि बेकारी मुख्य चिंतेचा विषय असल्याचं सांगितलं आहे. तर सौदीमधील नागरिकांनी बेकारी, दहशतवादी आणि कर या गोष्टी प्रामख्याने सतावत असल्याची माहिती दिली आहे.