शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटी द्या , शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:13 IST

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे.

- हरीष गुप्ता नवी दिल्ली : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे. गंभीर कृृषी संकटामुळे या प्रस्तावाकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.राष्ट्रपती भवनात झालेल्या राज्यपालांच्या संमेलनादरम्यान त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील दूरवरच्या आदिवासी भागात मोबाइल आणि टेलिफोनच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, मोबाइल कनेक्टिव्हिटी नसल्याने लोकांना चिकित्सा आणि आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात अडथळे येत आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना सेवा देण्याबाबत या अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, हा मुद्दा राज्याच्या नंदुरबार, गडचिरोली, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात तीव्र आहे.महाराष्ट्रातील राजभवनात त्यांच्या पुढाकारातून केलेल्या एका कामाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एक मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यातील राजभवनात स्थापन करण्यात आला आहे. देशातील सर्व राजभवनांपैकी हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. पहिल्या विश्व युद्धातील एका भुयाराचा मुंबईतील राजभवनात शोध लागल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, हे भुयार संरक्षित केले जात असून, या ठिकाणी आधुनिक संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि सहभागाचे प्रदर्शन यात असेल.

टॅग्स :Farmerशेतकरी