शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटी द्या , शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 04:13 IST

राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे.

- हरीष गुप्ता नवी दिल्ली : राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील ११४ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७१८० कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी केंद्राकडे केली आहे. गंभीर कृृषी संकटामुळे या प्रस्तावाकडे ‘विशेष प्रकरण’ म्हणून पाहावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.राष्ट्रपती भवनात झालेल्या राज्यपालांच्या संमेलनादरम्यान त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रातील दूरवरच्या आदिवासी भागात मोबाइल आणि टेलिफोनच्या कनेक्टिव्हिटीचा मुद्दा उपस्थित करून ते म्हणाले की, मोबाइल कनेक्टिव्हिटी नसल्याने लोकांना चिकित्सा आणि आपत्कालीन अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात अडथळे येत आहेत. विशेषत: गर्भवती महिलांना सेवा देण्याबाबत या अडचणी येत आहेत. ते म्हणाले की, हा मुद्दा राज्याच्या नंदुरबार, गडचिरोली, नांदेड आणि अमरावती जिल्ह्यात तीव्र आहे.महाराष्ट्रातील राजभवनात त्यांच्या पुढाकारातून केलेल्या एका कामाचा उल्लेख करून ते म्हणाले की, एक मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प पुण्यातील राजभवनात स्थापन करण्यात आला आहे. देशातील सर्व राजभवनांपैकी हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. पहिल्या विश्व युद्धातील एका भुयाराचा मुंबईतील राजभवनात शोध लागल्याचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, हे भुयार संरक्षित केले जात असून, या ठिकाणी आधुनिक संग्रहालय विकसित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनातील महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि सहभागाचे प्रदर्शन यात असेल.

टॅग्स :Farmerशेतकरी