शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:27 IST

CM Yogi Adityanath: गेल्या अवघ्या ३ दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

CM Yogi Adityanath: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. यानंतर आता प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. महाकुंभमेळ्यात सहभाग घेतल्यानंतर लाखो भाविक अयोध्येला जात आहेत. याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई पाहणी करून घेतला.

१४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत जवळपास ३० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी हजेरी लावली. भारतासह अनेक परदेशी नागरिकही महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. यानंतर भाविक अयोध्येला राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. गेल्या अवघ्या तीन दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अचानक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि राम मंदिर परिसराची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. 

अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे

मुख्यमंत्री योगी हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. रामजन्मभूमी आणि हनुमानगढीची हवाई पाहणी केली. मौनी अमावास्येनंतर अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आगामी वसंत पंचमी पर्वाच्या निमित्ताने सर्व गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. सलग आणि सातत्याने अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे एडीजी झोन, आयुक्त आणि पोलीस यांनी वसंत पंचमीच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि गर्दीच्या ठिकाणांची पायीच पाहणी केली.

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमी परिसराचे एसपी बलरामाचारी दुबे यांनी सांगितले की, मौनी अमावस्या उत्सवानिमित्त ३ लाख ८ हजार रामभक्तांनी दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून पहाटे ५ वाजल्यापासून रामललाचे दर्शन सुरू होते आणि रात्री ११ वाजता राम मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते. वाढीव वेळेमुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश