शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

३ दिवसांत ७० लाख लोक अयोध्येला, CM योगी आदित्यनाथांनी घेतला आढावा, महाकुंभमेळ्यातून धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:27 IST

CM Yogi Adityanath: गेल्या अवघ्या ३ दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

CM Yogi Adityanath: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानासाठी कोट्यवधी भाविक आले. त्या ठिकाणी ब्रह्म मुहूर्तावर झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाले. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही याबाबत तीव्र संवेदना व्यक्त केल्या. यानंतर आता प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. महाकुंभमेळ्यात सहभाग घेतल्यानंतर लाखो भाविक अयोध्येला जात आहेत. याचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई पाहणी करून घेतला.

१४४ वर्षांनी येणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी आतापर्यंत जवळपास ३० कोटींहून अधिक भाविक, पर्यटकांनी हजेरी लावली. भारतासह अनेक परदेशी नागरिकही महाकुंभमेळ्यासाठी आले आहेत. यानंतर भाविक अयोध्येला राम मंदिरात जाऊन रामललाचे दर्शन घेत आहेत. गेल्या अवघ्या तीन दिवसांत तब्बल ७० लाखांहून अधिक भाविक, पर्यटक अयोध्येत दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अचानक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि राम मंदिर परिसराची हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. 

अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे

मुख्यमंत्री योगी हेलिकॉप्टरने अयोध्येत पोहोचले. रामजन्मभूमी आणि हनुमानगढीची हवाई पाहणी केली. मौनी अमावास्येनंतर अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आगामी वसंत पंचमी पर्वाच्या निमित्ताने सर्व गोष्टींचा आढावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. सलग आणि सातत्याने अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसरीकडे एडीजी झोन, आयुक्त आणि पोलीस यांनी वसंत पंचमीच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि गर्दीच्या ठिकाणांची पायीच पाहणी केली.

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन

गेल्या २ दिवसांत ६ लाखांहून अधिक भाविकांनी राम मंदिरात रामललाचे दर्शन घेतले. रामजन्मभूमी परिसराचे एसपी बलरामाचारी दुबे यांनी सांगितले की, मौनी अमावस्या उत्सवानिमित्त ३ लाख ८ हजार रामभक्तांनी दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून पहाटे ५ वाजल्यापासून रामललाचे दर्शन सुरू होते आणि रात्री ११ वाजता राम मंदिर भाविकांसाठी बंद केले जाते. वाढीव वेळेमुळे अधिकाधिक भाविकांना दर्शनाचा लाभ मिळत आहे.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश