शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

मोदींच्या कार्यकाळात 10 पैकी 7 जण सुरक्षित, गॅलप वर्ल्डचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 21:50 IST

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांतील मतदानाचा चौथा टप्पा संपला असून प्रचाराचा जोर अधिकच वाढला आहे. या निवडणुकीत देशाची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा बनवून राजकीय पक्षांचे राजकारण सुरू आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे भांडवल भाजपा नेत्यांकडून प्रचारासाठी करण्यात येत आहेत. त्यातच, गॅलप वर्ल्ड पोल या जगप्रसिद्ध संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, रात्रीचे बाहेर फिरताना 10 पैकी 7 लोक स्वत:ला सुरक्षित समजतात.

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत. गॅलप वर्ल्ड पोलच्या सर्वेक्षणानुसार 10 पैकी 7 भारतीयांना मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यरात्री फिरताना सुरक्षित वाटते. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर, असे मत असलेल्यांची संख्या 17 टक्क्यांनी वाढली आहे. गॅलप वर्ल्ड पोल जगभरातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सर्वेक्षण करते. 2005 पासूनच भुकबळी, रोजगार, लिडरशीप परफॉर्मेंस यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या संस्थेने सर्वे केले आहेत. गॅलप ने भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत एक सर्व्हे केला. त्यामध्ये नागरिकांना व्यक्तिगत सुरक्षेपेक्षा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रणी घेत चिंता जोर दिला. या सर्वेनुसार 2017 मध्ये देशात 1000 दहशतवादी हल्ले झाले आहेत. जगभरात इराक आणि अफगानिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 

गॅलप सर्वेक्षणानुसार सुरक्षेसंदर्भात ग्रामीण आणि शहरी भारतीयांची मते वेगवेगळी आहेत. तर, प्रादेशिक विभागानुसारही यात भरपूर फरक आहे. पूर्व भारतातील 78 तर दक्षिण भारतातील 75 टक्के नागरिक रात्री बाहेर फिरताना स्वत:ला सुरक्षित समजतात. तर 60 टक्के उत्तर भारतीयांना सुरक्षित वाटते. दरम्यान, 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2016 च्या गुन्हेगारी आकडेवारीनुसार दिल्लीसह 20 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 19 शहरांमध्ये हत्या, बलात्कार आणि अपहरण यांसारख्या घटनांत वाढ झाली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकStrikeसंपIndiaभारत