शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोदींच्या कार्यकाळात 10 पैकी 7 जण सुरक्षित, गॅलप वर्ल्डचे सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 21:50 IST

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांतील मतदानाचा चौथा टप्पा संपला असून प्रचाराचा जोर अधिकच वाढला आहे. या निवडणुकीत देशाची सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा बनवून राजकीय पक्षांचे राजकारण सुरू आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचे भांडवल भाजपा नेत्यांकडून प्रचारासाठी करण्यात येत आहेत. त्यातच, गॅलप वर्ल्ड पोल या जगप्रसिद्ध संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, रात्रीचे बाहेर फिरताना 10 पैकी 7 लोक स्वत:ला सुरक्षित समजतात.

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत. गॅलप वर्ल्ड पोलच्या सर्वेक्षणानुसार 10 पैकी 7 भारतीयांना मोदी सरकारच्या कार्यकाळात मध्यरात्री फिरताना सुरक्षित वाटते. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर, असे मत असलेल्यांची संख्या 17 टक्क्यांनी वाढली आहे. गॅलप वर्ल्ड पोल जगभरातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सर्वेक्षण करते. 2005 पासूनच भुकबळी, रोजगार, लिडरशीप परफॉर्मेंस यांसारख्या अनेक मुद्द्यांवर या संस्थेने सर्वे केले आहेत. गॅलप ने भारतात ऑक्टोबर ते डिसेंबर 2018 या कालावधीत एक सर्व्हे केला. त्यामध्ये नागरिकांना व्यक्तिगत सुरक्षेपेक्षा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रणी घेत चिंता जोर दिला. या सर्वेनुसार 2017 मध्ये देशात 1000 दहशतवादी हल्ले झाले आहेत. जगभरात इराक आणि अफगानिस्ताननंतर भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. 

गॅलप सर्वेक्षणानुसार सुरक्षेसंदर्भात ग्रामीण आणि शहरी भारतीयांची मते वेगवेगळी आहेत. तर, प्रादेशिक विभागानुसारही यात भरपूर फरक आहे. पूर्व भारतातील 78 तर दक्षिण भारतातील 75 टक्के नागरिक रात्री बाहेर फिरताना स्वत:ला सुरक्षित समजतात. तर 60 टक्के उत्तर भारतीयांना सुरक्षित वाटते. दरम्यान, 2017 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2016 च्या गुन्हेगारी आकडेवारीनुसार दिल्लीसह 20 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या 19 शहरांमध्ये हत्या, बलात्कार आणि अपहरण यांसारख्या घटनांत वाढ झाली आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकStrikeसंपIndiaभारत