शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये पुराचा ७० लाख लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 22:43 IST

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे

गुवाहाटी : आसाममध्ये पुराचा कहर सुरूच असून ८० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे, तर ७० लाख लोकांना याचा फटका बसला आहे. मुसळधार पाउस आणि पुरामुळे राज्यातील ३३ पैकी २४ जिल्हे प्रभावित झाले आहेत.

मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, ७० लाखांवर लोकांना पुराचा फटका बसला आहे. लोकांना आणि जनावरांनाही या पुरातून बाहेर काढले जात असून शिबिरात ठेवले जात आहे. एकीकडे कोरोनामुळे लोक त्रस्त असताना राज्यात पुरामुळे आणखी संकट वाढले आहे. तरीही आमचे राज्य ही लढाई लढत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार लोकांना सर्वोतोपरी मदत करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याशी चर्चा केली होती आणि राज्यातील सध्याच्या स्थितीची माहिती घेऊन सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले होेते. केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बह्मपुत्रा, धनसिरी, भारली, कोपिली, बेकी, कुसियारा आणि संकोच या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

टॅग्स :floodपूर