शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

रस्ते बांधणीसाठी ७ लाख कोटी,३२ कोटी मनुष्यदिन रोजगारांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 04:25 IST

भारतमाला महामार्ग प्रकल्पातहत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणा-या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गांसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ६.९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८३ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वांत मोठ्या योजनेवर मंजुरीसह शिक्कामोर्तब केले आहे.

नवी दिल्ली : भारतमाला महामार्ग प्रकल्पातहत देशभरातील सीमावर्ती भागांना जोडणा-या ३४,००० किलोमीटर नवीन मार्गांसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ६.९२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह २०२२ पर्यंत ८३ हजार ६७७ किलोमीटर रस्त्यांचा विकास आणि विस्तार आजवरच्या सर्वांत मोठ्या योजनेवर मंजुरीसह शिक्कामोर्तब केले आहे.विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केलेली ही सर्वांत मोठी आणि महत्त्वपूर्ण घोषणा होय.आर्थिक घडामोडीला चालना देत देशभरात येत्या पाच वर्षांत किमान १४.२ कोटी मनुष्यदिन रोजगार निर्माण होतील. या योजनेत दोन मुख्य ठिकाणांदरम्यान चारपदरी रस्ते बांधून प्रमुख मार्गांवरील वाहतुकीचा वेग वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. हे विशेष मार्ग बव्हंशी लहान-लहान असतील. तसेच मालवाहक वाहनांच्या गतिमान हालचाली नियंत्रित असतील.खराब, अरुंद रस्ते आणि वाढत्या वर्दळीमुळे भारतात मालट्रक दिवसागणिक सरासरी २५०-३०० किलोमीटरचा पल्ला गाठू शकतात. तुलनेत विकसित देशांत हे प्रमाण प्रतिदिन ७००-८०० किलोमीटर आहे. या नवीन महामार्ग विकास कार्यक्रमात रस्ते तयार करून गतिमानतेत सुधारणा करून वाहतुकीचा खर्च कमी करण्याचा समावेश आहे. रस्त्यांचे उत्तम जाळे आणि नीटनेटके चिन्हाधारित रहदारीमुळे रस्ते वाहतूक क्षेत्रात लक्षणीय बदल होईल, असे एका अधिकाºयाने या योजनेबाबत सांगितले.भारतीय राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. यामुळे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्यास मदत होईल.प्रकल्पाची व्याप्तीभारतमाला ‘कनेक्टींग इडिया’ कार्यक्रमाबाबत पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, या प्रकल्पात ९००० किलोमीटरचे आर्थिक मार्गाचा समावेश आहे. आंतर मार्ग/ उपमार्ग ६ हजार किलोमीटर, राष्टÑीय मार्ग क्षमता सुधारणा ५ हजार किलोमीटर, सीमावर्ती मार्ग/ आंतरराष्टÑीय संपर्क मार्ग २००० किलोमीटर, किनारपट्टी मार्ग/बंदर जोड मार्ग २ हजार किलोमीटर, हरित क्षेत्र एक्स्प्रेस-वे ८०० किलोमीटर, राष्टÑीय महामार्गविकास प्रकल्पातील शिलकी१० हजार किलोमीटर प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी ५.३५ लाख कोटींचा खर्च येईल. भारतमाला प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती.>४४ आर्थिक विशेष महामार्गभारतमाला महामार्ग प्रकल्पात एकासल्लागार संस्थेने ४४ आर्थिक विशेष महामार्ग निश्चित केले होते.तसेच या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयाने सार्वजनिक गुंतवणूक मंडळाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यास सांगितले होते.व्यय सचिवाच्या अध्यक्षतेखालील सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने याला मंजुरी दिली होती.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा