शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

रात्रीच्या अंधारात १८ किमी चालत पोहोचल्या ६५ मुली, वॉर्डनचं कृत्य ऐकून अधिकारीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 21:21 IST

Jharkhand News: एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या.

रांची - झारखंडमध्ये गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू केले जात आहे. या विद्यालयामध्ये सर्व सरकारी सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र  वॉर्डनची मनमानी आणि सरकारी स्तरावर शाळांची तपासणी होत नसल्याने मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचं उदाहरण त्यावेळी पाहायला मिळालं, जेव्हा ६५ मुली रात्रीच्या अंधारात पायी चालत जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या आणि मदतीसाठी विनवणी केली. 

चाइबासा जिल्ह्यातील खुंटपानी कस्तुरबा विद्यालयामध्ये इंटरच्या विद्यार्थिनी वॉर्डनच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. येथे शिक्षण घेत असलेल्या एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या. एकाच वेळी ६५ मुलींना पाहून खळबळ उडाली. पाहता पाहता शिक्षण विभागातील कर्मचारी डीसी ऑफिसमध्ये पोहोचले.

त्यांनी विद्यार्थिनींची समजूत घालून त्यांना गाडीत बसवून पुन्हा शाळेत पोहोचवले. मात्र मुलींनी वॉर्डनबाबत जे काही सांगितले, त्याबाबत ऐकून सर्वांना धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा शिक्षण अधिक्षकांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली. तसेच डीसींनी या प्रकऱणाची तातडीने चौकशी करण्याची सूचना दिली.

या विद्यार्थिनींनी आरोप केला की, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींकडून अभ्यासाच्या वेळातही इतर कामं करवून घेतली जातात. चांगला नाश्ता दिला जात नाही. तसेच पोटभर भोजनही दिलं जात नाही. जिल्हा शिक्षण अधीक्षक अभय कुमार शील यांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. शाळेतील वॉर्डन मुलींचा मानसिक छळ करतात. तसेच तक्रार केल्यास वेगळी शिक्षा देतात, अशी तक्राव विद्यार्थिनींनी केली.

भीतीमुळे विद्यार्थिनी आई-वडिलांकडेही तक्राकर करत नाहीत. स्वच्छतेच्या नावाखाली त्यांच्याकडून दरमहा पाच रुपये उकळले जातात, तसेच ते न दिल्यास शिक्षा केली जाते. तसेच शिक्षा म्हणून शंभर ते दोनशे उठाबशा काढायला लावल्या जातात, अशी तक्रार विद्यार्थिनींनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडStudentविद्यार्थी