शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या अंधारात १८ किमी चालत पोहोचल्या ६५ मुली, वॉर्डनचं कृत्य ऐकून अधिकारीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 21:21 IST

Jharkhand News: एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या.

रांची - झारखंडमध्ये गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू केले जात आहे. या विद्यालयामध्ये सर्व सरकारी सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र  वॉर्डनची मनमानी आणि सरकारी स्तरावर शाळांची तपासणी होत नसल्याने मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचं उदाहरण त्यावेळी पाहायला मिळालं, जेव्हा ६५ मुली रात्रीच्या अंधारात पायी चालत जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या आणि मदतीसाठी विनवणी केली. 

चाइबासा जिल्ह्यातील खुंटपानी कस्तुरबा विद्यालयामध्ये इंटरच्या विद्यार्थिनी वॉर्डनच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. येथे शिक्षण घेत असलेल्या एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या. एकाच वेळी ६५ मुलींना पाहून खळबळ उडाली. पाहता पाहता शिक्षण विभागातील कर्मचारी डीसी ऑफिसमध्ये पोहोचले.

त्यांनी विद्यार्थिनींची समजूत घालून त्यांना गाडीत बसवून पुन्हा शाळेत पोहोचवले. मात्र मुलींनी वॉर्डनबाबत जे काही सांगितले, त्याबाबत ऐकून सर्वांना धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा शिक्षण अधिक्षकांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली. तसेच डीसींनी या प्रकऱणाची तातडीने चौकशी करण्याची सूचना दिली.

या विद्यार्थिनींनी आरोप केला की, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींकडून अभ्यासाच्या वेळातही इतर कामं करवून घेतली जातात. चांगला नाश्ता दिला जात नाही. तसेच पोटभर भोजनही दिलं जात नाही. जिल्हा शिक्षण अधीक्षक अभय कुमार शील यांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. शाळेतील वॉर्डन मुलींचा मानसिक छळ करतात. तसेच तक्रार केल्यास वेगळी शिक्षा देतात, अशी तक्राव विद्यार्थिनींनी केली.

भीतीमुळे विद्यार्थिनी आई-वडिलांकडेही तक्राकर करत नाहीत. स्वच्छतेच्या नावाखाली त्यांच्याकडून दरमहा पाच रुपये उकळले जातात, तसेच ते न दिल्यास शिक्षा केली जाते. तसेच शिक्षा म्हणून शंभर ते दोनशे उठाबशा काढायला लावल्या जातात, अशी तक्रार विद्यार्थिनींनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडStudentविद्यार्थी