शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या अंधारात १८ किमी चालत पोहोचल्या ६५ मुली, वॉर्डनचं कृत्य ऐकून अधिकारीही चक्रावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 21:21 IST

Jharkhand News: एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या.

रांची - झारखंडमध्ये गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे यासाठी कस्तुरबा गांधी विद्यालय सुरू केले जात आहे. या विद्यालयामध्ये सर्व सरकारी सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र  वॉर्डनची मनमानी आणि सरकारी स्तरावर शाळांची तपासणी होत नसल्याने मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचं उदाहरण त्यावेळी पाहायला मिळालं, जेव्हा ६५ मुली रात्रीच्या अंधारात पायी चालत जिल्ह्यातील उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या आणि मदतीसाठी विनवणी केली. 

चाइबासा जिल्ह्यातील खुंटपानी कस्तुरबा विद्यालयामध्ये इंटरच्या विद्यार्थिनी वॉर्डनच्या मनमानीमुळे त्रस्त आहेत. येथे शिक्षण घेत असलेल्या एक-दोन नाही तर तब्बल ६५ विद्यार्थिनींनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पीडित असल्याचा आरोप करत शाळेतून रात्रीच्या अंधारातच बाहेर पडल्या आणि १८ किमी पायी चालत सकाळी ७ वाजता उपायुक्त कार्यालयात पोहोचल्या. एकाच वेळी ६५ मुलींना पाहून खळबळ उडाली. पाहता पाहता शिक्षण विभागातील कर्मचारी डीसी ऑफिसमध्ये पोहोचले.

त्यांनी विद्यार्थिनींची समजूत घालून त्यांना गाडीत बसवून पुन्हा शाळेत पोहोचवले. मात्र मुलींनी वॉर्डनबाबत जे काही सांगितले, त्याबाबत ऐकून सर्वांना धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा शिक्षण अधिक्षकांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली. तसेच डीसींनी या प्रकऱणाची तातडीने चौकशी करण्याची सूचना दिली.

या विद्यार्थिनींनी आरोप केला की, येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींकडून अभ्यासाच्या वेळातही इतर कामं करवून घेतली जातात. चांगला नाश्ता दिला जात नाही. तसेच पोटभर भोजनही दिलं जात नाही. जिल्हा शिक्षण अधीक्षक अभय कुमार शील यांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थिनींशी संवाद साधला आणि त्यांच्या तक्रारी ऐकल्या. शाळेतील वॉर्डन मुलींचा मानसिक छळ करतात. तसेच तक्रार केल्यास वेगळी शिक्षा देतात, अशी तक्राव विद्यार्थिनींनी केली.

भीतीमुळे विद्यार्थिनी आई-वडिलांकडेही तक्राकर करत नाहीत. स्वच्छतेच्या नावाखाली त्यांच्याकडून दरमहा पाच रुपये उकळले जातात, तसेच ते न दिल्यास शिक्षा केली जाते. तसेच शिक्षा म्हणून शंभर ते दोनशे उठाबशा काढायला लावल्या जातात, अशी तक्रार विद्यार्थिनींनी केली. 

टॅग्स :JharkhandझारखंडStudentविद्यार्थी