शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:43 IST

...म्हणजेच मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी मागील पाच वर्षांमध्ये मुलाखतीला सामोरे गेलेल्या ५२,९१० उमेदवारांपैकी तब्बल ३३,९५० उमेदवारांची निवड होऊ शकलेली नाही. म्हणजेच मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) माध्यमातून घेण्यात आलेल्या मुलाखतींशी संबंधित आहे. उमेदवारांनी पूर्वीच्या परीक्षांमध्ये यश मिळवूनही अंतिम निवड टप्प्यात अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने अशा उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी उमेदवारांची माहिती जाहीर करण्याची योजना लागू केली असून, याअंतर्गत उमेदवारांचा तपशील खासगी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी खुला केला जातो.

 ‘प्रतिभा-सेतू’ देईल संधी‘यूपीएससी’ने नुकतेच ‘प्रतिभा-सेतू’ हे पोर्टल सुरू केले आहे. खासगी कंपन्या, पीएसयू आणि इतर संस्था येथे नोंदणी करून अपात्र उमेदवारांचा डेटा पाहू शकतात. या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

१० वर्षांत केंद्र सरकारमध्ये ४.८ लाख जणांना नोकरीकेंद्र सरकारने सन २०१६ पासून सुमारे ४.८ लाख रिक्त पदे भरली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. भरतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या बॅकलॉग पदांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मंत्रालयाने अंतर्गत समिती स्थापन करून बॅकलॉग पदांचा आढावा घ्यावा, त्यामागील कारणांचा अभ्यास करून विशेष भरती मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

एकूण ५२,९१० उमेदवारांनी मुलाखतीत भाग घेतला. त्यातील ३३,९५० उमेदवारांची अंतिम निवड झाली नाही.डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री

स्वायत्त संस्थांतील सेवेसाठी मिळेल ग्रॅच्युइटीस्वायत्त संस्थांमध्ये केलेली सेवा आता केंद्र सरकारकडून ग्रॅच्युइटीच्या हक्कासाठी वैध सेवा काळ मानली जाणार आहे. जर एखादा कर्मचारी स्वायत्त संस्थेतून योग्य परवानगी घेऊन आणि राजीनामा देऊन केंद्र सरकारमध्ये नियुक्त झाला, आणि त्या संस्थेत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) लागू होती, तर त्याचा स्वायत्त संस्थेतील सेवा काळ ग्रॅच्युइटी गणनेत समाविष्ट केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, हे धोरण फक्त त्या संस्थांनाच लागू असेल जिथे केंद्राच्या धर्तीवर ग्रॅच्युइटी दिली जाते. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगjobनोकरी