शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:43 IST

...म्हणजेच मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी मागील पाच वर्षांमध्ये मुलाखतीला सामोरे गेलेल्या ५२,९१० उमेदवारांपैकी तब्बल ३३,९५० उमेदवारांची निवड होऊ शकलेली नाही. म्हणजेच मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) माध्यमातून घेण्यात आलेल्या मुलाखतींशी संबंधित आहे. उमेदवारांनी पूर्वीच्या परीक्षांमध्ये यश मिळवूनही अंतिम निवड टप्प्यात अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारने अशा उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी उमेदवारांची माहिती जाहीर करण्याची योजना लागू केली असून, याअंतर्गत उमेदवारांचा तपशील खासगी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी खुला केला जातो.

 ‘प्रतिभा-सेतू’ देईल संधी‘यूपीएससी’ने नुकतेच ‘प्रतिभा-सेतू’ हे पोर्टल सुरू केले आहे. खासगी कंपन्या, पीएसयू आणि इतर संस्था येथे नोंदणी करून अपात्र उमेदवारांचा डेटा पाहू शकतात. या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

१० वर्षांत केंद्र सरकारमध्ये ४.८ लाख जणांना नोकरीकेंद्र सरकारने सन २०१६ पासून सुमारे ४.८ लाख रिक्त पदे भरली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली. भरतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या बॅकलॉग पदांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मंत्रालयाने अंतर्गत समिती स्थापन करून बॅकलॉग पदांचा आढावा घ्यावा, त्यामागील कारणांचा अभ्यास करून विशेष भरती मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

एकूण ५२,९१० उमेदवारांनी मुलाखतीत भाग घेतला. त्यातील ३३,९५० उमेदवारांची अंतिम निवड झाली नाही.डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री

स्वायत्त संस्थांतील सेवेसाठी मिळेल ग्रॅच्युइटीस्वायत्त संस्थांमध्ये केलेली सेवा आता केंद्र सरकारकडून ग्रॅच्युइटीच्या हक्कासाठी वैध सेवा काळ मानली जाणार आहे. जर एखादा कर्मचारी स्वायत्त संस्थेतून योग्य परवानगी घेऊन आणि राजीनामा देऊन केंद्र सरकारमध्ये नियुक्त झाला, आणि त्या संस्थेत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) लागू होती, तर त्याचा स्वायत्त संस्थेतील सेवा काळ ग्रॅच्युइटी गणनेत समाविष्ट केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, हे धोरण फक्त त्या संस्थांनाच लागू असेल जिथे केंद्राच्या धर्तीवर ग्रॅच्युइटी दिली जाते. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगjobनोकरी