शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

CoronaVirus India Update: दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल 

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 08:42 IST

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus india update)

ठळक मुद्देदेशातील ६०२ जिल्ह्यात आठवडाभरात कोरोना मृत्यू नाहीउपचाराधीन कोरोना रुग्ण संख्येत घटमहाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती काहीशी गंभीर

नवी दिल्ली : कोरोना संकटाचे सावट असताना देशासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवडाभरात ६०२ जिल्ह्यांत एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. (602 districts reported no corona death in last one week in india)

एका वृत्तवाहिनीनुसार, देशभरातील ७२९ जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाबाबतची माहिती गोळा करण्यात आली. यातील ११६ जिल्हे असे आहे, जेथे गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० पेक्षा अधिक नाही. सदरची आकडेवारी १० फेब्रुवारीपर्यंतची आहे, असे सांगितले जात आहे. भारतात आतापर्यंत दीड लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (coronavirus india update)

कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ

महाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती गंभीर

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही राज्यातील १० जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. 

२६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात सुधारणा

देशभरातील २६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठवडाभरात १० किंवा १० पेक्षा कमी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील ९ केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. 

कोरोना उपचाराधीन रुग्ण संख्येत घट

कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. आतापर्यंत कोरोनामुळे कमीत कमी ७३४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीकरणात भारत जगात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. १ मार्च २०२१ पर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे लक्ष्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. आताच्या घडीला देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या १.४१ लाख इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याKeralaकेरळ