शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

CoronaVirus India Update: दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल 

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 08:42 IST

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus india update)

ठळक मुद्देदेशातील ६०२ जिल्ह्यात आठवडाभरात कोरोना मृत्यू नाहीउपचाराधीन कोरोना रुग्ण संख्येत घटमहाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती काहीशी गंभीर

नवी दिल्ली : कोरोना संकटाचे सावट असताना देशासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवडाभरात ६०२ जिल्ह्यांत एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. (602 districts reported no corona death in last one week in india)

एका वृत्तवाहिनीनुसार, देशभरातील ७२९ जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाबाबतची माहिती गोळा करण्यात आली. यातील ११६ जिल्हे असे आहे, जेथे गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० पेक्षा अधिक नाही. सदरची आकडेवारी १० फेब्रुवारीपर्यंतची आहे, असे सांगितले जात आहे. भारतात आतापर्यंत दीड लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (coronavirus india update)

कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ

महाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती गंभीर

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही राज्यातील १० जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. 

२६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात सुधारणा

देशभरातील २६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठवडाभरात १० किंवा १० पेक्षा कमी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील ९ केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. 

कोरोना उपचाराधीन रुग्ण संख्येत घट

कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. आतापर्यंत कोरोनामुळे कमीत कमी ७३४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीकरणात भारत जगात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. १ मार्च २०२१ पर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे लक्ष्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. आताच्या घडीला देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या १.४१ लाख इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याKeralaकेरळ