शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus India Update: दिलासादायक! आठवडाभरात ६०० जिल्ह्यांत एकही कोरोना मृत्यू नाही; नियंत्रणाच्या दिशेने वाटचाल 

By देवेश फडके | Updated: February 11, 2021 08:42 IST

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. (coronavirus india update)

ठळक मुद्देदेशातील ६०२ जिल्ह्यात आठवडाभरात कोरोना मृत्यू नाहीउपचाराधीन कोरोना रुग्ण संख्येत घटमहाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती काहीशी गंभीर

नवी दिल्ली : कोरोना संकटाचे सावट असताना देशासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून आली आहे. यासह उपचाराधीन रुग्णांच्या संख्याही कमी झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवडाभरात ६०२ जिल्ह्यांत एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. (602 districts reported no corona death in last one week in india)

एका वृत्तवाहिनीनुसार, देशभरातील ७२९ जिल्ह्यांतील कोरोना संसर्गाबाबतची माहिती गोळा करण्यात आली. यातील ११६ जिल्हे असे आहे, जेथे गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १० पेक्षा अधिक नाही. सदरची आकडेवारी १० फेब्रुवारीपर्यंतची आहे, असे सांगितले जात आहे. भारतात आतापर्यंत दीड लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (coronavirus india update)

कांदा रडवणार! आवक घटल्याने मुंबईत दरामध्ये लक्षणीय वाढ

महाराष्ट्र आणि केरळमधील स्थिती गंभीर

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही राज्यातील १० जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, तिरुवनंतपूरम, कोझिकोड, कोल्लाम आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे. 

२६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात सुधारणा

देशभरातील २६ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठवडाभरात १० किंवा १० पेक्षा कमी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यातील ९ केंद्र शासित प्रदेशातील काही भागांमध्ये गेल्या आठडाभरात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही. 

कोरोना उपचाराधीन रुग्ण संख्येत घट

कोरोनाचे संकट अद्यापही दूर झालेले नाही. आतापर्यंत कोरोनामुळे कमीत कमी ७३४ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. कोरोना लसीकरणात भारत जगात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. १ मार्च २०२१ पर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचे लक्ष्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. आताच्या घडीला देशात कोरोना उपचाराधीन रुग्णांची संख्या १.४१ लाख इतकी आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याKeralaकेरळ