शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी "या" आजोबांनी चालवली तब्बल 11 दिवस 1000 किमी सायकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 14:30 IST

Satyadev Manjhi And Farmers Protest : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कायदे रद्दच करा, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एका व्यक्तीने तब्बल 1000 किमीचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी तब्बल 11 दिवस सायकल चालवली आहे. 

सत्यदेव मांझी असं या व्यक्तीचं नाव असून ते शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय सत्यदेव हे बिहारच्या सीवान जिल्ह्याचे रहिवासी आहेत. दिल्ली-हरियाणाच्या टिकरी सीमेवर शेतकऱ्यांना आपले समर्थन देण्यासाठी पोहोचले आहेत. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी सलग 11 दिवस सायकल चालवत 1000 किलोमीटरचे अंतर पार करत प्रवास केला. शेतकऱ्यांचे हीत पाहता सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत अशी विनंती सत्यदेव मांझी यांनी केंद्र सरकारला केली आहे. 

सत्यदेव मांझी यांनी एएनआयशी बोलताना, "मला सीवान येथून टिकरी सीमेवर पोहोचण्यासाठी 11 दिवस लागले. मी सरकारला तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची विनंती केली आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन संपेपर्यंत मी आता इथेच राहणार आहे" असं म्हटलं आहे. कडाक्याच्या थंडीत गेल्या 22 दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. याच दरम्यान गुरुवारी पहाटे शेतकरी आंदोलनातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. 

कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलनातील आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू

दिल्ली-हरियाणाच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये पंजाबच्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. पंजाबच्या या 37 वर्षीय शेतकऱ्याला 10, 12 आणि 14 वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास 20 आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात तापमान कमी आहे. पहाटेच्या सुमारास जवळपास पाच डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसाही तापमान 4 डिग्रीपर्यंत नोंदवण्यात येतं. कडाक्याच्या थंडीतही आपला जीव धोक्यात घालूनही शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. 

कडक सॅल्यूट! सिंघू बॉर्डरवर कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांना 'ही' व्यक्ती वाटते मोफत स्वेटर

सिंघू बॉर्डरवर शकील मोहम्मद कुरेशी कडाक्याच्या थंडीत बसलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति असलेला आदर व्यक्त करत आहेत. शकील मोहम्मद कुरेशी शेतकऱ्यांना मोफत स्वेटर वाटत आहेत. दररोज सकाळी आठ वाजता कुरेशी रस्त्याच्या कडेला आपला स्टॉल लावतात आणि स्थानिक ठिकाणी तयार केलेले स्वेटर नव्या केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली-हरयाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ते मोफत वाटत आहेत. कुरेशी यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत 300 जॅकेट्स आणि स्वेटरचं वाटप केलं आहे. कुरेशी हे गरम कपडे विकण्याचे काम करतात. ते दररोज 2500 रुपयांची कमाई करतात. 

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपdelhiदिल्ली