शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

धक्कादायक! दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 जण पडले आजारी; 25 जणांची प्रकृती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 10:02 IST

दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 हून अधिक लोक आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांनी उलट्या आणि जुलाबाची तक्रार केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात हँडपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 हून अधिक लोक आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांनी उलट्या आणि जुलाबाची तक्रार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने आरोग्य विभागाचे पथक पाठवले. यासोबतच तो हँडपंपही बंद करण्यात आला आहे. सागर जिल्ह्यातील बांदा ब्लॉकमधील पिडरुआ गावात हँडपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने ही भयंकर घटना घडली आहे. 

आरोग्य विभागाने परिसरात शिबिरे घेऊन जनजागृती सुरू केली आहे. पावसात पाणी कसे प्यावे हे ग्रामस्थांना सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर जिल्ह्यातील पिडरुआ येथे रविवारी एकामागून एक 60 लोक आजारी पडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना उलट्या आणि जुलाबाच्या तक्रारी सुरू झाल्या. सर्वांना बुंदेलखंड मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर 25 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे 25 रुग्ण वगळता उर्वरित रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. याची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी कामाला लागले असून, आता घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून औषधांचे वाटप करण्यात येत आहे. 

पावसात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले आहे. पावसाचे पाणी आजूबाजूला साचते अशा ठिकाणी हँडपंप बसवले आहेत. हँडपंपाच्या आजूबाजूला पाणी साचल्यानंतर त्याचे पाणी वापरल्याने उलट्या, जुलाबाच्या समस्या होत आहेत. पहिल्या दिवशी उलट्या व जुलाबाचे प्रमाण कमी होत होते, मात्र रविवारी हा त्रास वाढल्याने आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक आर्य यांच्या सूचनेवरून सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. 

दूषित पाणी देणारे हँडपंप तातडीने बंद करण्यात आले असून आजूबाजूला क्लोरीनची फवारणी करण्यात येत आहे. संबंधित गावाव्यतिरिक्त इतर गावांमध्ये असा धक्कादायक प्रकार घडू नये यासाठी तातडीने क्लोरीन व पाणी स्वच्छ करण्यासाठी औषधांची फवारणी करावी, तसेच गावांमध्ये उभारलेल्या विहिरींमध्ये क्लोरीन पावडर टाकण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश