शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर ६ रुग्णांची दृष्टीच गेली, मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश; कानपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:28 IST

कानपूरच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

कानपूर-

कानपूरच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील एका नर्सिंग होममध्ये लावण्यात आलेल्या आय कॅम्पमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केलेल्या ६ रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर दृष्टीच गेली आहे. रुग्णांच्या डोळ्यात अशाप्रकारचं इन्फेक्शन झालं की त्यांना आता दिसेनासं झालं आहे. या घटनेनंतर बरेच दिवस रुग्णालयात खेटे घालूनही काही होत नसल्यानं अखेर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे याची तक्रार दाखल केली आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयानं तातडीनं यात लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीच्या आधारावरच शहरात हे कॅम्प डीबीसीएस योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार शिवराजपूरमधील रहिवासी असलेल्या या रुग्णांनी २ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या आराध्या नर्सिंग होममध्ये विनाशुल्क आय कॅम्पमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली होती. डॉ. नीगर गुप्ता यांनी या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना त्याच दिवशी घरी सोडण्यात आलं होतं. 

रुग्णांच्या आरोपानुसार या शस्त्रक्रियेनंतरच त्यांच्या डोळ्यात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यानंतर डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि दिसणंच बंद झालं आहे. रुग्णालयात जाऊन याची तक्रार दिली असता त्यांना घरी पाठवण्यात आलं. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाचा दरवाजा ठोठावला, असं पीडित रुग्णांनी सांगितलं. 

सरकारकडून मिळतो निधीआराध्या आय हॉस्पीटलमध्ये याआधीपासूनच अशा प्रकारचे डोळ्यांची तपासणी करणारे शिबीर घेतले जात आले आहेत. यात रुग्णांवर विनाशुल्क मोतिबिंदूचं ऑपरेशन देखील केलं जातं. यासाठीचा निधी सरकारकडून रुग्णालयाला दिला जातो. सीएमओच्या परवानगीनुसारच डीबीसीएस योजनेअंतर्गत कॅम्प चालवला जात होता.