शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर ६ रुग्णांची दृष्टीच गेली, मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश; कानपूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:28 IST

कानपूरच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.

कानपूर-

कानपूरच्या आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील एका नर्सिंग होममध्ये लावण्यात आलेल्या आय कॅम्पमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केलेल्या ६ रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर दृष्टीच गेली आहे. रुग्णांच्या डोळ्यात अशाप्रकारचं इन्फेक्शन झालं की त्यांना आता दिसेनासं झालं आहे. या घटनेनंतर बरेच दिवस रुग्णालयात खेटे घालूनही काही होत नसल्यानं अखेर त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे याची तक्रार दाखल केली आहे. 

मुख्यमंत्री कार्यालयानं तातडीनं यात लक्ष घालून चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीच्या आधारावरच शहरात हे कॅम्प डीबीसीएस योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले होते. समोर आलेल्या माहितीनुसार शिवराजपूरमधील रहिवासी असलेल्या या रुग्णांनी २ नोव्हेंबर रोजी कानपूरच्या आराध्या नर्सिंग होममध्ये विनाशुल्क आय कॅम्पमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली होती. डॉ. नीगर गुप्ता यांनी या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना त्याच दिवशी घरी सोडण्यात आलं होतं. 

रुग्णांच्या आरोपानुसार या शस्त्रक्रियेनंतरच त्यांच्या डोळ्यात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यानंतर डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि दिसणंच बंद झालं आहे. रुग्णालयात जाऊन याची तक्रार दिली असता त्यांना घरी पाठवण्यात आलं. त्यामुळेच आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाचा दरवाजा ठोठावला, असं पीडित रुग्णांनी सांगितलं. 

सरकारकडून मिळतो निधीआराध्या आय हॉस्पीटलमध्ये याआधीपासूनच अशा प्रकारचे डोळ्यांची तपासणी करणारे शिबीर घेतले जात आले आहेत. यात रुग्णांवर विनाशुल्क मोतिबिंदूचं ऑपरेशन देखील केलं जातं. यासाठीचा निधी सरकारकडून रुग्णालयाला दिला जातो. सीएमओच्या परवानगीनुसारच डीबीसीएस योजनेअंतर्गत कॅम्प चालवला जात होता.