शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

5G Launch in India: आता 'बफरिंग' विसरा... इंटरनेट होणार सुपरफास्ट; भारतात 5G चा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 11:39 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला. 1 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाइल काँग्रेस (India Mobile Congress) कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G सेवेची सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री देवुसिंह चौहान उपस्थित होते.

यावेळी त्यांना तीन टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवांचा डेमो दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबांनी, एअरटेलचे प्रमुख सुनिल मित्तल, व्होडाफोन आयडियाचे कुमार बिर्ला देखील होते. याशिवाय आकाश अंबानी यांनीदेखील पंतप्रधानांना 5G सेवांची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिओ पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित ट्रू 5G उपकरणे पाहिली आणि 'Jio-Glass' चा अनुभव घेतला.

आपण देशात 5G सेवा जरी उशिरा सुरू केली असली तरी देशभरात ती लवकर पूर्ण करणारे देश ठरणार आहोत. डिसेंबर २०२३ पर्यंत 5G ची चं जाळ संपूर्ण देशभरात पसवणार असल्याचं आश्वासन देत ही परवडणारी सेवा असेल असं आश्वासन अंबानी यांनी दिले. 

आज देशात 5G सेवांचा शुभारंभ करण्यात आला ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं मत अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. मुकेश अंबानी यांनीही यावर्षी झालेल्या रिलायन्सच्या एजीएममध्ये दिवाळीपर्यंत Jio 5G सेवा सुरू होणार असल्याचे सांगितले होते. पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात त्याचे रोलआउट केले जाईल. पॅन इंडिया 5G नेटवर्कच्या विस्तारासाठी कंपनी 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आज नव्या युगाची आज सुरूवात होत आहे. मुकेश अंबानी जसं म्हणाले त्याप्रमाणे 5G सेवांमुळे तरूणांसाठी अनेक संधी उपलब्ध होईल. आज आपल्याकडे असं नेतृत्व आहे जे तंत्रज्ञानाला समजतात याचा आम्हाला अभिमान आहे. हे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचं आहे. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा ई ग्राम आणणारेही तेही होते. उद्योगांच्या पाठिंब्यासाठीही ते पुढे येतात. मुकेश अंबानींनी 4G सेवेलाही गती दिली. कोरोनाच्या काळातही तंत्रज्ञानामुळे आपण जराही थांबलो नाही, असं मत मित्तल यांनी व्यक्त केलं. आज आपला देश उत्पादनाचा देश बनतोय. पंतप्रधानांनी स्टार्टअप इंडियाची घोषणा दिली. 5G मुळे येत्या काळात आणखी उद्योजक तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दिल्ली, वाराणसी, मुंबईसह काही शहरामध्ये आजपासूनच 5G सेवा उपलब्ध होईल आणि मार्च २०२४ पर्यंत संपूर्ण देशात ही सेवा सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.दीर्घ काळापासून होती प्रतीक्षा5G मुळे इंटरनेटचा स्पीड तर वाढणारच आहे, पण याशिवाय उत्तम टेलिकॉम सेवा आणि कॉल कनेक्टिव्हीटीही मिळेल. यामुळे ग्राहकांना उत्तम सेवेचा अनुभव घेता येणार आहे. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर ही सेवा केव्हा सुरू केली जाणार याबाबत उत्सुकता होती. परंतु आता या सेवेची सुरूवात करण्यात आली आहे. संपूर्ण देशात ही सेवा सुरू होण्यासाठी काही काळ लागणार आहे. सध्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल देशात 5G सेवा सुरू करणार आहेत. परंतु व्होडाफोन आयडियानं मात्र सेवांबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMukesh Ambaniमुकेश अंबानीAkash Ambaniआकाश अंबानीReliance Jioरिलायन्स जिओ