शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

५८ लाख स्थलांतरित पोचले गावी, ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 04:56 IST

केंद्र सरकारची कामगिरी : ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या सुमारे ५८ लाख स्थलांतरित मजुरांना श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांतून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत देशभरात ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थलांतरित मजुरांकरिता श्रमिक रेल्वे गाड्या पाठविण्याची राज्यांकडून होणारी मागणी आता घटत चालली आहे. पूर्वी रोज २५० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात होत्या. आता हीच संख्या १३७वर आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी देशात ५६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. दरम्यान, काही रेल्वेगाड्या ज्या ठिकाणी जायचे होते, त्या ठिकाणी न पोचता दुसऱ्याच ठिकाणी गेल्याचाही प्रकार घडला होता. अनेक भागातील मजुरांना वाहनेच न मिळाल्याने त्यांनी पायीच आपला प्रवास सुरु केला होता. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, श्रमिक विशेष रेल्वेगाडीने जाणाºया स्थलांतरित मजुरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रेल्वेने जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, कपडे, स्लीपर व अन्य जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या होत्या. जे स्थलांतरित मजूर पायी चालत गावाकडे निघाले होते, त्यांना नॅशनल हायवेज आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) मदतीने श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांमध्ये जागा उपलब्ध करून देऊन गावी पाठविण्यात आले.श्रमिकांचे लॉकडाऊनमुळे खूप हालकोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्त्यावरील सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेले स्थलांतरित मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपल्या गावांकडे निघाले. त्यात त्यांचे खूप हाल होत असल्याने खूप आरडाओरड झाल्यानंतर केंद्र सरकारने १ मेपासून श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. त्यातून ५८ लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेMigrationस्थलांतरण