शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

५८ लाख स्थलांतरित पोचले गावी, ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 04:56 IST

केंद्र सरकारची कामगिरी : ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकून पडलेल्या सुमारे ५८ लाख स्थलांतरित मजुरांना श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांतून त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले आहे. त्यासाठी आतापर्यंत देशभरात ४२८६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी शनिवारी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्थलांतरित मजुरांकरिता श्रमिक रेल्वे गाड्या पाठविण्याची राज्यांकडून होणारी मागणी आता घटत चालली आहे. पूर्वी रोज २५० श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविल्या जात होत्या. आता हीच संख्या १३७वर आली आहे. गुरुवारी व शुक्रवारी देशात ५६ श्रमिक विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या. दरम्यान, काही रेल्वेगाड्या ज्या ठिकाणी जायचे होते, त्या ठिकाणी न पोचता दुसऱ्याच ठिकाणी गेल्याचाही प्रकार घडला होता. अनेक भागातील मजुरांना वाहनेच न मिळाल्याने त्यांनी पायीच आपला प्रवास सुरु केला होता. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अलीकडेच दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, श्रमिक विशेष रेल्वेगाडीने जाणाºया स्थलांतरित मजुरांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रेल्वेने जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, कपडे, स्लीपर व अन्य जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या होत्या. जे स्थलांतरित मजूर पायी चालत गावाकडे निघाले होते, त्यांना नॅशनल हायवेज आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एनएचएआय) मदतीने श्रमिक विशेष रेल्वेगाड्यांमध्ये जागा उपलब्ध करून देऊन गावी पाठविण्यात आले.श्रमिकांचे लॉकडाऊनमुळे खूप हालकोरोना साथीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वेसेवा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्याचबरोबर रस्त्यावरील सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवाही ठप्प होती. त्यामुळे देशाच्या विविध भागांत अडकलेले स्थलांतरित मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपल्या गावांकडे निघाले. त्यात त्यांचे खूप हाल होत असल्याने खूप आरडाओरड झाल्यानंतर केंद्र सरकारने १ मेपासून श्रमिक विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या. त्यातून ५८ लाख स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी नेण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेMigrationस्थलांतरण