शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

५१% भारतीय महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 04:29 IST

भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे

नवी दिल्ली : भारतातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे, तर अनेक महिला लठ्ठपणाशी निगडित रोगांचा सामना करत असल्याचेही दिसून आले आहे. ग्लोबल न्यूट्रिशन रिपोर्ट २०१७ मधून ही माहिती समोर आली आहे.भारतातील अर्ध्याहून अधिक महिला अ‍ॅनेमियाशी (अशक्तपणा) झगडत आहेत, तर २२ टक्के वयस्क महिलांचे वजन अधिक आहे. हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता असणाºया देशांत भारताखालोखाल चीन, पाकिस्तान, नायजेरिया आणि इंडोनेशिया आहेत.जगातील १४० देशातील स्थितीचे यात विश्लेषण करण्यात आले आहे. काही सरकारांनी ही समस्या ओळखण्यास सुरुवात केली आहे, पण भारताने याबाबत काही प्रगती केली नाही. विशेषत: भारतात आई बनण्याच्या वयात महिलांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते. २०१६ मध्ये अहवालातून स्पष्ट झाले होते की, ४८ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता आहे.डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की, भारतात अ‍ॅनेमियाच्या कारणामागे के वळ पोषण हे कारण नाही, तर स्वच्छतेकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष हेही कारण आहे. प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. इंदू तनेजा यांचे म्हणणे आहे की, प्रजननाच्या वयात अ‍ॅनेमिया महिला आणि मुलांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण करतो.

टॅग्स :Indiaभारत