शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अटल पेन्शन योजनेसाठी 51. 33 लाख लोकांनी केली नोंदणी

By अोंकार करंबेळकर | Updated: August 26, 2017 14:04 IST

केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर स्वच्छ भारत योजनेसाठी यावर्षी 7856 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअटल पेन्शन योजनेत 1883.93 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.या योजनेसाठी 2015-16 या वर्षासाठी केंद्र सरकारने 105.46 कोटींचे योगदान दिले आहे.

मुंबई, दि.26- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्र सरकार 2015 साली अर्थसंकल्पामध्ये अटल पेन्शन योजना सुरु करत असल्याचे जाहीर केले. या योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे स्थित माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी विचारलेल्या माहितीला पेन्शन आणि पेन्शनर्स वेल्फेअर विभागाने दिलेल्या उत्तरात ही आरडेवारी स्पष्ट झाली आहे.

प्रफुल्ल सारडा यांनी अटल पेन्शन योजनेच्या अंतर्गत किती खाती उघडण्यात आली, त्यामध्ये किती पैसे जमा झाले आणि त्यामध्ये सरकारचे योगदान काय असे तीन प्रश्न विचारले होते. त्याला मिळालेल्या उत्तरामध्ये 51. 33 लाख लोकांनी खाती सुरु केल्याचे आणि त्यामध्ये 1883.93 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 2015-16 या वर्षासाठी केंद्र सरकारने 105.46 कोटींचे योगदान दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत योजनेसाठी 7856 कोटींची तरतूद

अटल पेन्शन योजनेप्रमाणेच स्वच्छ भारत योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेमध्ये येताच जाहीर केलेली योजना आहे. गंगा नदी शुद्धीकरण आणि सार्वजनिक स्वच्छता या दोन विषयांवर त्यांनी विशेष लक्ष देणार असल्याचे जाहीर केले. प्रफुल्ल सारडा यांनी पंतपर्धान कार्यालयाला विचारलेल्या दुसऱ्या एका माहिती अर्जामधून स्वच्छ भारत योजनेसाठी 2016-17 वर्षासाठी 7856 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मिळाली आहे, 2015-16 या वर्षासाठी 6392.95 कोटी रुपयांची तरतूद या योजनेसाठी केली गेली होती  व प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक म्हणजे 9370 कोटी रुपये खर्च केले गेले तर त्याआधीच्या वर्षी 2730 कोटी रुपयांची स्वच्छ भारतसाठी तरतूद केली गेली होती व 3094 कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले होते. ही आकडेवारी पाहता 2020 पर्यंत  'स्वच्छ भारत'चे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने भारत पावले टाकत आहे अशा शब्दांमध्ये प्रफुल्ल सारडा यांनी समाधान व्यक्त केले आहे. अटल पेन्शन योजनेमध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करत आहेत, आगामी काळामध्ये गुंतवणुकदारांची संख्या वाढेल अशी अपेक्षा सारडा यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Indiaभारत