शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांना द्यावे लागणार ५० हजार; 'असा' ठरणार उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 15:54 IST

इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. जेणेकरून उमेदवारांची पार्श्वभूमी तपासून घेता येईल

नवी दिल्ली – तेलंगणात कांग्रेस विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी करत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात यावर्ष अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकच्या धर्तीवर प्लॅनिंग करण्याची योजना आखली आहे. तेलंगणात एससी, एसटी, दिव्यांग कॅटेगिरीतील इच्छुक उमेदवारांना २५ हजार आणि इतरांना ५० हजार शुल्क आकारण्यात येणार आहे.

कर्नाटक निवडणुकीत सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज आणि अन्य कागदपत्रांसह २ लाख रुपये शुल्क पक्षाने आकारले होते. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १ लाख रुपये शुल्क होते. काँग्रेस पॅनेल सदस्य आणि तेलंगणा प्रदेश कार्याध्यक्ष महेश कुमार गौड म्हणाले की, काँग्रेसनं निवडणुकीत योग्य उमेदवार निवडीसाठी माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजा नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय उपसमिती बनवली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. २५ ऑगस्टपूर्वी ५० हजार किंवा २५ हजार डीडीसह हा अर्ज जमा करायचा आहे. उपसमितीने अर्जाची रक्कम २५ हजार ठेवावी अशी शिफारस केली होती परंतु पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने शुल्क म्हणून ५० हजार रुपये घ्यावे अशा सूचना केल्या असं त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया माहिती भरावी लागेल

इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. जेणेकरून उमेदवारांची पार्श्वभूमी तपासून घेता येईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात प्रदेश कार्यकारणीची बैठक होईल. त्यात सर्व इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिफारशीनुसार उमेदवारी दिली जाईल. मागील २ विधानसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१८ यात कुठलेही शुल्क आकारले नाही. परंतु २००९ च्या निवडणुकीत पक्षाने १० हजार रुपये शुल्क घेतले होते.

केंद्रीय निवडणूक समिती घेणार निर्णय

उमेदवारी अर्जासोबत ज्यांनी शुल्क दिले आहे त्यातील मजबूत दावेदार पुढे येतील. सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज पडताळणीसाठी पाठवले जातील. प्रत्यक्ष मतदारसंघात स्थिती आणि उमेदवाराची ताकद तपासली जाईल. यानंतर छाननी प्रक्रियेत जे अर्ज निवडले जातील त्याची शिफारस केंद्रीय निवडणूक कमिटीकडे केली जाईल. उमेदवारांची यादी ठरवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक समितीचा आहे. आम्ही केवळ शिफारस आणि सल्ला देऊ शकतो. अंतिम निर्णय आणि यादी जाहीर दिल्लीतून होईल. उमेदवार एकाहून अधिक मतदारसंघासाठी इच्छुक असेल तर तसे अर्ज भरू शकतो असंही राज्याचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकTelanganaतेलंगणा