शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुकांना द्यावे लागणार ५० हजार; 'असा' ठरणार उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 15:54 IST

इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. जेणेकरून उमेदवारांची पार्श्वभूमी तपासून घेता येईल

नवी दिल्ली – तेलंगणात कांग्रेस विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी करत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात यावर्ष अखेरीस निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेस नेतृत्वाने कर्नाटकच्या धर्तीवर प्लॅनिंग करण्याची योजना आखली आहे. तेलंगणात एससी, एसटी, दिव्यांग कॅटेगिरीतील इच्छुक उमेदवारांना २५ हजार आणि इतरांना ५० हजार शुल्क आकारण्यात येणार आहे.

कर्नाटक निवडणुकीत सामान्य श्रेणीतील इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज आणि अन्य कागदपत्रांसह २ लाख रुपये शुल्क पक्षाने आकारले होते. तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १ लाख रुपये शुल्क होते. काँग्रेस पॅनेल सदस्य आणि तेलंगणा प्रदेश कार्याध्यक्ष महेश कुमार गौड म्हणाले की, काँग्रेसनं निवडणुकीत योग्य उमेदवार निवडीसाठी माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजा नरसिम्हा यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय उपसमिती बनवली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी एक अर्ज तयार करण्यात आला आहे. २५ ऑगस्टपूर्वी ५० हजार किंवा २५ हजार डीडीसह हा अर्ज जमा करायचा आहे. उपसमितीने अर्जाची रक्कम २५ हजार ठेवावी अशी शिफारस केली होती परंतु पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने शुल्क म्हणून ५० हजार रुपये घ्यावे अशा सूचना केल्या असं त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया माहिती भरावी लागेल

इच्छुक उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया खात्याची माहिती द्यावी लागणार आहे. जेणेकरून उमेदवारांची पार्श्वभूमी तपासून घेता येईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात प्रदेश कार्यकारणीची बैठक होईल. त्यात सर्व इच्छुक उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी होईल. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिफारशीनुसार उमेदवारी दिली जाईल. मागील २ विधानसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१८ यात कुठलेही शुल्क आकारले नाही. परंतु २००९ च्या निवडणुकीत पक्षाने १० हजार रुपये शुल्क घेतले होते.

केंद्रीय निवडणूक समिती घेणार निर्णय

उमेदवारी अर्जासोबत ज्यांनी शुल्क दिले आहे त्यातील मजबूत दावेदार पुढे येतील. सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज पडताळणीसाठी पाठवले जातील. प्रत्यक्ष मतदारसंघात स्थिती आणि उमेदवाराची ताकद तपासली जाईल. यानंतर छाननी प्रक्रियेत जे अर्ज निवडले जातील त्याची शिफारस केंद्रीय निवडणूक कमिटीकडे केली जाईल. उमेदवारांची यादी ठरवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक समितीचा आहे. आम्ही केवळ शिफारस आणि सल्ला देऊ शकतो. अंतिम निर्णय आणि यादी जाहीर दिल्लीतून होईल. उमेदवार एकाहून अधिक मतदारसंघासाठी इच्छुक असेल तर तसे अर्ज भरू शकतो असंही राज्याचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकTelanganaतेलंगणा