शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

गुजरातमध्ये पाच हजार शेतकऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:57 IST

गुजरात वीज महामंडळाने (जीपीसीएल) १२ गावांमधील शेतकºयांची शेतजमीन बळजबरीने हिसकावून घेतली आहे.

अहमदाबाद : राज्य वीज महामंडळाने प्रकल्पासाठी सक्तीने जमीन अधिग्रहण केल्याविरोधात गुजरातमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून, १२ गावांतील ५ हजारांहून अधिक शेतकºयांनी सरकार पत्र पाठवून इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. एकीकडे केंद्र सरकार शेतकºयांना दीडपट हमी भाव देण्याची तयारी करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात शेतकºयांवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.गुजरात खेडूत समाजाचे सदस्य शेतकरी नरेंद्रसिंह गोहिल यांनी याबाबत सांगितले की, गुजरात वीज महामंडळाने (जीपीसीएल) १२ गावांमधील शेतकºयांची शेतजमीन बळजबरीने हिसकावून घेतली आहे. यामुळे जवळपास ५,२५९ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले. या शेतकºयांनी आता पत्र लिहून इच्छामरणाचा परवानगी मागितली आहे. शेतकरी व त्यांच्या नातेवाईकांनी ही पत्रे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवली आहेत.भावनगरचे जिल्हाधिकारी हर्षद पटेल यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयांची इच्छामरणाची मागणी करणारी पत्रे मिळाली आहेत, याला दुजोरा दिला परंतु नेमकी या पत्रांची संख्या नेमकी किती आहे, हे त्यांनी सांगितले नाही. या पत्रात शेतकºयांनी आरोप केला आहे की, जीपीसीएलने पोलीस बळाचा वापर करून त्यांना जमिनी देण्यास भाग पाडले. २० वर्षे उलटून गेली तरीही जीपीसीएल या जमिनीवर ताबा सोडण्यास तयार नसून, हे कृत्य बेकायदा आहे. या जमिनी परत मिळवण्यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे संघर्ष करीत आहोत. नरेंद्रसिंह गोहिल यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार कोणतीही कंपनी अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षांहून अधिक काळ आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही.पाच वर्षांहून अधिक काळ जमीन ताब्यात ठेवायची असेल तर कंपनीला जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया नव्याने राबवावी लागते. आमचे शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी दोन वेळा अश्रूधूराचा मारा केला आहे. आम्हाला सरकारकडून धमकावले जात आहे. भावनगर जिल्हा प्रशासनाने त्या १२ गावांमध्ये जमावबंदी विरोधी कमल १४४ लागू केले आहे, अशीही माहिती गोहिल यांनी दिली.गुजरात सरकार आमच्यासाठी दहशतवाद्यांसारखेसरकारला लिहिलेल्या पत्रात शेतकºयांनी म्हटले आहे की, जीपीसीएल आणि गुजरात सरकारला आमच्या मालकीची जमीन बळजबरीने हिसकावून घ्यायची आहे. तर आम्ही आमची जमीन कसू शकलो नाही तर आम्ही जवळपास मेल्यात जमा आहोत. बळजबरीने झालेल्या भूसंपादनामुळे आम्हाला सरकार दहशतवाद्यांप्रमाणे वाटू लागले आहे. त्यामुळे आमची अखेरची इच्छा आहे की, लष्कराच्या जवानाच्या गोळीने आम्हाला मृत्यू यावा.

टॅग्स :Farmerशेतकरी