शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

गुजरातमध्ये पाच हजार शेतकऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:57 IST

गुजरात वीज महामंडळाने (जीपीसीएल) १२ गावांमधील शेतकºयांची शेतजमीन बळजबरीने हिसकावून घेतली आहे.

अहमदाबाद : राज्य वीज महामंडळाने प्रकल्पासाठी सक्तीने जमीन अधिग्रहण केल्याविरोधात गुजरातमध्ये शेतकरी आक्रमक झाले असून, १२ गावांतील ५ हजारांहून अधिक शेतकºयांनी सरकार पत्र पाठवून इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. एकीकडे केंद्र सरकार शेतकºयांना दीडपट हमी भाव देण्याची तयारी करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहराज्यात शेतकºयांवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.गुजरात खेडूत समाजाचे सदस्य शेतकरी नरेंद्रसिंह गोहिल यांनी याबाबत सांगितले की, गुजरात वीज महामंडळाने (जीपीसीएल) १२ गावांमधील शेतकºयांची शेतजमीन बळजबरीने हिसकावून घेतली आहे. यामुळे जवळपास ५,२५९ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले. या शेतकºयांनी आता पत्र लिहून इच्छामरणाचा परवानगी मागितली आहे. शेतकरी व त्यांच्या नातेवाईकांनी ही पत्रे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठवली आहेत.भावनगरचे जिल्हाधिकारी हर्षद पटेल यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयांची इच्छामरणाची मागणी करणारी पत्रे मिळाली आहेत, याला दुजोरा दिला परंतु नेमकी या पत्रांची संख्या नेमकी किती आहे, हे त्यांनी सांगितले नाही. या पत्रात शेतकºयांनी आरोप केला आहे की, जीपीसीएलने पोलीस बळाचा वापर करून त्यांना जमिनी देण्यास भाग पाडले. २० वर्षे उलटून गेली तरीही जीपीसीएल या जमिनीवर ताबा सोडण्यास तयार नसून, हे कृत्य बेकायदा आहे. या जमिनी परत मिळवण्यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे संघर्ष करीत आहोत. नरेंद्रसिंह गोहिल यांनी सांगितले की, जमीन अधिग्रहण कायदा २०१३ नुसार कोणतीही कंपनी अधिग्रहित केलेली जमीन पाच वर्षांहून अधिक काळ आपल्या ताब्यात ठेवू शकत नाही.पाच वर्षांहून अधिक काळ जमीन ताब्यात ठेवायची असेल तर कंपनीला जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया नव्याने राबवावी लागते. आमचे शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी दोन वेळा अश्रूधूराचा मारा केला आहे. आम्हाला सरकारकडून धमकावले जात आहे. भावनगर जिल्हा प्रशासनाने त्या १२ गावांमध्ये जमावबंदी विरोधी कमल १४४ लागू केले आहे, अशीही माहिती गोहिल यांनी दिली.गुजरात सरकार आमच्यासाठी दहशतवाद्यांसारखेसरकारला लिहिलेल्या पत्रात शेतकºयांनी म्हटले आहे की, जीपीसीएल आणि गुजरात सरकारला आमच्या मालकीची जमीन बळजबरीने हिसकावून घ्यायची आहे. तर आम्ही आमची जमीन कसू शकलो नाही तर आम्ही जवळपास मेल्यात जमा आहोत. बळजबरीने झालेल्या भूसंपादनामुळे आम्हाला सरकार दहशतवाद्यांप्रमाणे वाटू लागले आहे. त्यामुळे आमची अखेरची इच्छा आहे की, लष्कराच्या जवानाच्या गोळीने आम्हाला मृत्यू यावा.

टॅग्स :Farmerशेतकरी