शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

५०० कर्मचारी भरतीला सहकाची मंजुरी एकनाथराव खडसे: रेल्वे स्थानकावर स्वागत ; जिल्हा बॅँकेत तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2016 18:28 IST

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५०० कर्मचार्‍यांची भरती करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या माध्यमातून सध्या असलेल्या कर्मचार्‍यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.

जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत ५०० कर्मचार्‍यांची भरती करण्यास सहकार विभागाने मान्यता दिली आहे. या माध्यमातून सध्या असलेल्या कर्मचार्‍यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्मचारी, अधिकार्‍यांच्या पतसंस्थेतर्फे आयोजित वार्षिक सभा व कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या सत्कार सोहळ्यास एकनाथराव खडसे यांची उपस्थिती होती. बॅँकेचे धाडसी कर्मचारी, त्यांचे पाल्य तसेच हिंदी साहित्यातील राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या प्रा. उर्मिला पाटील यांचा यावेळी खडसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कर्मचार्‍यांचे परिश्रम
यावेळी बोलताना खडसे म्हणाले, बॅँक सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. बॅँकेच्या या वाटचालीत कर्मचार्‍यांचे सर्वात जास्त परिश्रम आहेत. अवघे धरू सुपंथ अशीच या बॅँकेची वाटचाल केवळ कर्मचार्‍यांमुळे आहे. राज्यातील १२ बॅँकांचे लायसन्स रद्द झाले. ११ बॅँका क वर्गात होत्या. राज्यात केवळ सात ते आठ जिल्हा बॅँका जिवंत आहेत. त्यात जळगाव जिल्हा बॅँकेचा समावेश असल्याचा आपणास अभिमान असून त्याचं श्रेय तुम्हाला आहे. बॅँकेच्या ठेवी २६५० कोटींवर गेल्या त्या तीन हजार कोटींपर्यंत नेण्याचा आपणास प्रयत्न करायचा आहे.
५०० कर्मचारी भरती
बॅँकेत कर्मचारी कमी आहेत. अनेक वर्षात भरती झाली नाही हे लक्षात घेऊन सहकार विभागाकडे या संदर्भात मागणी केली होती. ५०० कर्मचार्‍यांची भरती करण्यास मान्यता मिळाली आहे. किमान ४०० कर्मचारी तरी भरती करून असलेल्या कर्मचार्‍यांवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. कर्मचार्‍यांचा पंतप्रधान विमा योजनेत विमाही उतरवून घेण्यात आला आहे. तसेच संचालक मंडळाची विशेष सभा घेऊन आणखी काही कर्मचार्‍यांना देता येईल काय? असे प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.