शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात 50 टक्के भारतीयांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिली लाच, सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 09:20 IST

गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात दर १० पैकी ८ लोकांनी पोलीस, पालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याची कबुली दिली आहे.

नवी दिल्ली- गेल्या वर्षभरात दर १० पैकी ५ भारतीयांनी त्यांची कामं पूर्ण करून घेण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे. एका ऑनलाईन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात दर १० पैकी ८ लोकांनी पोलीस, पालिकेच्या अधिकाऱ्यांना लाच दिल्याची कबुली दिली आहे. याशिवाय मालमत्ता नोंदणी आणि व्हॅटसाठी लहान-मोठी लाच देणाऱ्यांचं प्रमाणदेखील ८० टक्के इतकं आहे.

लोकल सर्कल या वेबसाईटने देशातील भ्रष्टाचाराच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण केलं होतं. यासाठी देशातील २०० पेक्षा अधिक शहरांमधून ऑनलाईन माहिती गोळा केली असल्याचा दावा वेबासाईटने केला. यामध्ये सुमारे १ लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतल्याची माहितीही या वेबसाईटने दिली आहे. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना भ्रष्टाचाराबद्दल ८ प्रश्न विचारण्यात आले होते.या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २५ टक्के लोकांनी आतापर्यंत अनेकदा लाच दिल्याचं सांगितलं. तर २० टक्के लोकांनी गेल्या वर्षभरात त्यांना एक किंवा दोनवेळा लाच द्यावी लागल्याचं म्हटलं. भविष्यनिर्वाह निधी, आयकर, सेवा कर आणि रेल्वेशी संबंधित प्रकरणांमध्ये लाच द्यावी लागल्याची कबुली देणाऱ्यांचं प्रमाण ९ टक्के असल्याचं या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. दुसरीकडे, फक्त लाच दिल्यानेच काम होऊ शकतं, असं मानणाऱ्यांचं प्रमाण एक तृतीयांश इतकं आहे. लाच न दिल्यास आपलं काम अडकेल, असं मानणाऱ्या लोकांचं प्रमाण २० टक्के आहे. राज्य आणि स्थानिक प्रशासनाने लाचखोरी कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात कोणतीही पावलं उचलली नाहीत, असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या आर्ध्याहून अधिक जणांनी व्यक्त केलं. 

लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणातून देशातील भ्रष्टाचार अजूनही कमी झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे, या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी करण्यासाठी उचलण्यात आलेली पावलं फार प्रभावी नसल्याचं म्हंटलं. भ्रष्टाचाराची तक्रार करणं अतिशय कठीण काम असल्याचं अनेकांचं मत आहे. लाचखोरीची तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारांकडून सुरु करण्यात आलेल्या हॉटलाईन व्यवस्थित काम करत करतात असं फक्त 9 टक्के लोकांनी म्हंटलं आहे.