शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

साखरपुडा झाला, मंडप सजला पण नवरदेव आलाच नाही; कारण दुसऱ्या पक्षाने 50 लाख हुंडा दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 11:48 IST

नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे, मात्र लग्न न झाल्याची विचित्र घटना गोरखपूरमध्ये समोर आली आहे. दुसऱ्या पक्षाकडून हुंड्यात कितीतरी पटीने जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने पहिले लग्न मोडलं. 10 मे रोजी हे लग्न होणार होतं. मुलीच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. सगळे नातेवाईक जमले होते.याच दरम्यान, नवरदेवाच्या अचानक अशा वागण्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखनाथ परिसरातील आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. गोरखनाथ परिसरातील विकास नगर, बरगडवा येथील एका मुलीचे लग्न चिलुआताल भागातील राप्तीनगर येथील अरुण उपाध्याय यांचा मुलगा प्रशांत उपाध्याय याच्यासोबत निश्चित झाले होते. साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर 10 मे रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र शेवटच्या क्षणी मुलांनी लग्नास नकार दिला. 

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, मुलांनी हुंड्याची रक्कम घेतली आणि गाडीची रक्कमही घेतली. पण, दुसऱ्या पक्षाकडून 50 लाख हुंड्याची ऑफर आल्याने त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुलीने तिच्या माहेरच्या नातेवाईकांसह मुलाच्या घरी पोहोचून लग्न न करण्याचे कारण विचारले. त्यावर त्याला अन्य पक्षाकडून एकूण 50 लाखांचा हुंडा मिळत असल्याचे सांगण्यात आले. 

जास्त हुंडा मिळत असल्याने ते लग्न करू शकत नाहीत. यानंतर मुलीच्या घरच्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत ​​त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी तरुण प्रशांत उपाध्याय, त्याचे वडील अरुण उपाध्याय आणि आई नलिनी उपाध्याय यांच्याविरुद्ध चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक जयंत कुमार सिंह यांनी सांगितले की, चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

टॅग्स :marriageलग्न