शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत देश गाठणार ५० कोटी 'मेक इन इंडिया' मोबाइलचा टप्पा; अजय कुमार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:42 IST

भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील. तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांची माहिती.

नवी दिल्ली, दि. १४- भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील,अशी माहिती माहिती तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांनी दिली आहे. इएलसीआयएनएच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या फोनच्या व्हॅल्यू अॅडिशनच्या प्रमाणातही लक्षणीय प्रगती होत असल्याचे कुमार म्हणाले. पुर्वी हे प्रमाण १०% होते. आता ते २०% असून यापुढच्या काळात ते ३५% टक्क्यांवर जाणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली.

अजय कुमार यांच्याप्रमाणेच इलेक्ट्राँनिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही केले. कोणतेही उत्पादन हे मेक इन इंडिया असावे, यावर भर दिला पाहिजे असे रिजिजू म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही परस्पर सामंजस्य कराराच्या मदतीने करुन भारतातच उत्पादने बनवू शकता. भारताच्या हिताला आपण पहिले प्राधान्य दिले पाहिजे, म्हणूनच मी मेक इन इंडियावर नेहमी भर देतो. एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत आपण सर्वोत्तम गुणवत्ता व परिपूर्ण बनू शकतो. मात्र दीर्घ कालाचा विचार करता ते उत्पादन मेड इन इंडिया असले पाहिजे हे आपण लक्षात ठेवावे असे रिजिजू यांनी उपस्थितांना सांगितले. 

संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी तसेच नवे संशोधन नवे विचार घेऊन उद्योगांनी पुढे यावे असे आवाहनही रिजिजू यांनी केले. 'मला तुमची याबाबत मते हवी आहेत, तुमच्या सुचना हव्या आहेत. तुम्ही उद्योगांनी नव्या सूचनांसह पुढे आलं पाहिजे. सरकारला तुम्ही योग्य धोरण आखण्यासाठी तुम्ही सूचना कराव्यात म्हणजे अशा धोरणाच्या आधारावर आपण भारताला उत्पादनाचे मोठे केंद्र बनवू शकू ' असे रिजिजू यांनी उद्योजकांना आवाहन केले.                        

टॅग्स :Mobileमोबाइल