शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

२०२० पर्यंत देश गाठणार ५० कोटी 'मेक इन इंडिया' मोबाइलचा टप्पा; अजय कुमार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:42 IST

भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील. तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांची माहिती.

नवी दिल्ली, दि. १४- भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील,अशी माहिती माहिती तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांनी दिली आहे. इएलसीआयएनएच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या फोनच्या व्हॅल्यू अॅडिशनच्या प्रमाणातही लक्षणीय प्रगती होत असल्याचे कुमार म्हणाले. पुर्वी हे प्रमाण १०% होते. आता ते २०% असून यापुढच्या काळात ते ३५% टक्क्यांवर जाणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली.

अजय कुमार यांच्याप्रमाणेच इलेक्ट्राँनिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही केले. कोणतेही उत्पादन हे मेक इन इंडिया असावे, यावर भर दिला पाहिजे असे रिजिजू म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही परस्पर सामंजस्य कराराच्या मदतीने करुन भारतातच उत्पादने बनवू शकता. भारताच्या हिताला आपण पहिले प्राधान्य दिले पाहिजे, म्हणूनच मी मेक इन इंडियावर नेहमी भर देतो. एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत आपण सर्वोत्तम गुणवत्ता व परिपूर्ण बनू शकतो. मात्र दीर्घ कालाचा विचार करता ते उत्पादन मेड इन इंडिया असले पाहिजे हे आपण लक्षात ठेवावे असे रिजिजू यांनी उपस्थितांना सांगितले. 

संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी तसेच नवे संशोधन नवे विचार घेऊन उद्योगांनी पुढे यावे असे आवाहनही रिजिजू यांनी केले. 'मला तुमची याबाबत मते हवी आहेत, तुमच्या सुचना हव्या आहेत. तुम्ही उद्योगांनी नव्या सूचनांसह पुढे आलं पाहिजे. सरकारला तुम्ही योग्य धोरण आखण्यासाठी तुम्ही सूचना कराव्यात म्हणजे अशा धोरणाच्या आधारावर आपण भारताला उत्पादनाचे मोठे केंद्र बनवू शकू ' असे रिजिजू यांनी उद्योजकांना आवाहन केले.                        

टॅग्स :Mobileमोबाइल