शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

२०२० पर्यंत देश गाठणार ५० कोटी 'मेक इन इंडिया' मोबाइलचा टप्पा; अजय कुमार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 14:42 IST

भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील. तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांची माहिती.

नवी दिल्ली, दि. १४- भारतीय बनावटीचे मोबाइल फोन्सचे उत्पादन सध्या जोरात सुरु असून २०१९-२० या वर्षापर्यंत या फोन्सची संख्यी २० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. २०१४ साली आपण ६ कोटी मोबाइल फोन्सची निर्मिती केली, २०१६-१७ साली ती संख्या १७.५ कोटींवर गेली तर २०१९-२० साली ५० कोटी मेक इन इंडिया मोबाइल फोन्स बनवले जातील,अशी माहिती माहिती तंत्रज्ञान खात्याचे अतिरिक्त सचिव अजय कुमार यांनी दिली आहे. इएलसीआयएनएच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. या फोनच्या व्हॅल्यू अॅडिशनच्या प्रमाणातही लक्षणीय प्रगती होत असल्याचे कुमार म्हणाले. पुर्वी हे प्रमाण १०% होते. आता ते २०% असून यापुढच्या काळात ते ३५% टक्क्यांवर जाणार असल्याची माहिती कुमार यांनी दिली.

अजय कुमार यांच्याप्रमाणेच इलेक्ट्राँनिक क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे कौतुक केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनीही केले. कोणतेही उत्पादन हे मेक इन इंडिया असावे, यावर भर दिला पाहिजे असे रिजिजू म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही परस्पर सामंजस्य कराराच्या मदतीने करुन भारतातच उत्पादने बनवू शकता. भारताच्या हिताला आपण पहिले प्राधान्य दिले पाहिजे, म्हणूनच मी मेक इन इंडियावर नेहमी भर देतो. एखाद्या उत्पादनाच्या बाबतीत आपण सर्वोत्तम गुणवत्ता व परिपूर्ण बनू शकतो. मात्र दीर्घ कालाचा विचार करता ते उत्पादन मेड इन इंडिया असले पाहिजे हे आपण लक्षात ठेवावे असे रिजिजू यांनी उपस्थितांना सांगितले. 

संरक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी तसेच नवे संशोधन नवे विचार घेऊन उद्योगांनी पुढे यावे असे आवाहनही रिजिजू यांनी केले. 'मला तुमची याबाबत मते हवी आहेत, तुमच्या सुचना हव्या आहेत. तुम्ही उद्योगांनी नव्या सूचनांसह पुढे आलं पाहिजे. सरकारला तुम्ही योग्य धोरण आखण्यासाठी तुम्ही सूचना कराव्यात म्हणजे अशा धोरणाच्या आधारावर आपण भारताला उत्पादनाचे मोठे केंद्र बनवू शकू ' असे रिजिजू यांनी उद्योजकांना आवाहन केले.                        

टॅग्स :Mobileमोबाइल