शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

५ लाख कोटींची कर्जवसुली अडकली कोर्टाच्या दिरंगाईत

By admin | Updated: January 4, 2017 05:58 IST

प्रलंबित कामांचा डोंगर उपसण्यासाठी कर्जवसुली न्यायाधिकरणामध्ये पुरेशा साधनसुविधा नसल्याने, बँका आणि वित्तीय संस्थांची सुमारे पाच लाख कोटी रुपये कर्जांची ७० हजारांहून

नवी दिल्ली : प्रलंबित कामांचा डोंगर उपसण्यासाठी कर्जवसुली न्यायाधिकरणामध्ये पुरेशा साधनसुविधा नसल्याने, बँका आणि वित्तीय संस्थांची सुमारे पाच लाख कोटी रुपये कर्जांची ७० हजारांहून अधिक प्रकरणे अनेक वर्षे पडून राहिल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला धारेवर धरले. या न्यायाधिकरणांनी ठरावीक मुदतीत प्रकरणे निकाली काढावीत, अशी अपेक्षा असेल, तर त्यासाठी सरकारने त्यांना त्या प्रमाणात न्यायाधीश, कर्मचारीवर्ग आणि अन्य साधनसुविधा पुरवायला हव्यात, असा आग्रह न्यायालयाने धरला.या न्यायाधिकरणांनी त्यांच्याकडे दाखल होणारी वसुली प्रकरणे सहा महिन्यांत निकाली काढण्याचे बंधन घालणारा सुधारित कायदा संसदेने तीन महिन्यांपूर्वी मंजूर केला. त्याचा संदर्भ देत, न्यायालयाने म्हटले की, कामाच्या प्रमाणात साधनसुविधा नसतील, तर ही न्यायाधिकरणे वेळेचे हे बंधन पाळू शकणार नाहीत व कायदा कागदावरच राहील. याच कटू अनुभवातून अलाहाबाद येथील कर्जवसुली न्यायाधिकरणाच्या अध्यक्षांनी अलीकडेच राजीनामा दिला, असेही न्यायालयाने खेदाने नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)सरकारच्या नाकर्तेपणावर नाराजी - थकीत कर्जे आणि त्यांची विलंबाने होणारी वसुली या संदर्भात ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ने केलेली एक जनहित याचिका प्रलंबित आहे. - मावळते सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर यांच्या कामकाजाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्यासह न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे पुढील सुनावणी झाली, तेव्हा सद्यस्थितीचा आढावा घेऊन न्यायालयाने सरकारच्या नाकर्तेपणावर नाराजी व्यक्त केली. - मुळात न्यायाधिकरणांमधील सध्याच्या साधनसुविधा पाहता, ती नव्या कायद्यानुसार कालमर्यादा खरेच पाळू शकतील, असे सरकारला तरी मनापासून वाटते का? तसेच मुळात अशी मर्यादा ठरविताना सरकारने काही शास्त्रशुद्ध अभ्यास केला होता का? असे सवाल करून न्यायालयाने त्याची उत्तरे देणारे प्रतिज्ञापत्र चार आठवड्यांत करण्यास सांगितले.कर्जवसुलीची विदारक आकडेवारी- 500कोटी रुपयांहून ज्यांची अधिकची कर्जे थकीत आहेत, अशा कंपन्यांची नावे व १० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या वसुली प्रकरणांची माहितीही माहितीही न्यायालयाने मागविली.- एकूण कर्जवसुली न्यायाधिकरणे34- अपिली न्यायाधिकरणे : ५- 1993मध्ये स्थापना झाली तेव्हाची थकित कर्जे 6100कोटी रुपये- आत्तापर्यंत निकाली प्रकरणे १.३४ लाख-त्यातून झालेली कर्जवसुली-७०,७२५ कोटी - गतवर्षी निकाली प्रकरणे16000- त्यातून कर्जवसुली34000 कोटी रुपये- प्रलंबित प्रकरणे70000- अडकलेली कर्जे500000कोटी रुपये- कर्जवसुली न्यायाधिकरणे स्थापन होण्यापूर्वी बँका व वित्तीय संस्थांचे १५ लाखांहून अधिक वसुली दावे दिवाणी न्यायालयांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित होते. ही स्थिती देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगली नाही व झटपट कर्जवसुली होऊन बँका सुदृढ व्हाव्या, यासाठी २३ वर्षांपूर्वी वसुलीसाठी स्वतंत्र न्यायाधिकरणे स्थापन केली गेली. - वेळोवेळी या कायद्यांत सुधारणा केल्या गेल्या. या न्यायाधिकरणांकडे महत्त्वाच्या न्यायनिवाड्याची जबाबदारी सोपविलेली आहे.- सर्वोच्च न्यायालय