शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

१२ राज्यांतून प्रवास करणाऱ्या ५ भारतीय रेल्वे; दिब्रूगढ़ - कन्याकुमारी अंतर ४२४७ किलोमीटर, लागतात ८२.५० तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 07:22 IST

Indian Railways : लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेश आहे. 

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा वेग कमी होताच इंडियन रेल्वेनेरेल्वेंचा वेग आणि संख्या वाढवली आहे. लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेशआहे. यात अशा काही रेल्वे आहेत की, ज्या १२-१२ राज्यांत प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. यात त्यांना अनेक दिवस लागतात. भारतात सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या या आहेत पाच रेल्वे.

१ दिब्रूगढ कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस : भारतात सर्वात लांबच्या अंतराचा प्रवास करणाऱ्या रेल्वेंत ही क्रमांक एक आहे. ही रेल्वे दिब्रूगढ़ ते कन्याकुमारी हे ४२४७ किलोमीटरचे अंतर ८२.५० तासांत पूर्ण करते. या प्रवासात ही रेल्वे ५७ स्थानकांवर थांबते.

२ कटरा-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस : ही देशातील लांबचा प्रवास करणारी दुसरी रेल्वे आहे. हिचा प्रवास ३७८२ किलोमीटरचा असून तो पूर्ण करण्यासाठी ७१ तास ४० मिनिटे लागतात. ही गाडी माता वैष्णो देवी कटरा हून कन्याकुमारीला पोहोचते. १२ राज्यांतून जाणारी ही रेल्वे ७५ स्थानकांवर थांबते. याशिवाय भारतात कोणत्याही रेल्वेला इतक्या ठिकाणी थांबावे लागत नाही.

३ कटरा-मंगळुरू नवयुग एक्स्प्रेस : ही रेल्वे देशात तिसरी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. ती जम्मू-कश्मीरमधील कटराहून मंगळुरूला पोहोचते. हा प्रवास ७२.५० तासांचा असून ३६७४ किलोमीटरचे अंतर कापते. ही रेल्वे १२ राज्यांत ६७ स्थानकांवर थांबते.

४ न्यू तिनसुकिया-बंगळुरू सिटी एक्स्प्रेस : ही रेल्वे आसाममधील न्यू तिनसुकियाहून निघून ६५ तास ५५ मिनिटांत ३६१५ कि.मी.चा प्रवास करून बंगळुरूला थांबते.

५ गुवाहाटी-तिरुअनंतपूरम एक्स्प्रेस : आसाममधील गुवाहाटीहून निघून केरळमधील त्रिवेंद्रमपर्यंत जाते. या प्रवासासाठी ६४.१५ तास लागतात व ३५५२ किलोमीटरचा प्रवास घडतो. ५० स्थानकांवर ती थांबते.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे