शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

१२ राज्यांतून प्रवास करणाऱ्या ५ भारतीय रेल्वे; दिब्रूगढ़ - कन्याकुमारी अंतर ४२४७ किलोमीटर, लागतात ८२.५० तास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 07:22 IST

Indian Railways : लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेश आहे. 

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा वेग कमी होताच इंडियन रेल्वेनेरेल्वेंचा वेग आणि संख्या वाढवली आहे. लाखो लोकांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेंमध्ये कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत आणि ईशान्य भारताला दक्षिण भारताशी जोडणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा यात समावेशआहे. यात अशा काही रेल्वे आहेत की, ज्या १२-१२ राज्यांत प्रवास करून ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. यात त्यांना अनेक दिवस लागतात. भारतात सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या या आहेत पाच रेल्वे.

१ दिब्रूगढ कन्याकुमारी विवेक एक्स्प्रेस : भारतात सर्वात लांबच्या अंतराचा प्रवास करणाऱ्या रेल्वेंत ही क्रमांक एक आहे. ही रेल्वे दिब्रूगढ़ ते कन्याकुमारी हे ४२४७ किलोमीटरचे अंतर ८२.५० तासांत पूर्ण करते. या प्रवासात ही रेल्वे ५७ स्थानकांवर थांबते.

२ कटरा-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस : ही देशातील लांबचा प्रवास करणारी दुसरी रेल्वे आहे. हिचा प्रवास ३७८२ किलोमीटरचा असून तो पूर्ण करण्यासाठी ७१ तास ४० मिनिटे लागतात. ही गाडी माता वैष्णो देवी कटरा हून कन्याकुमारीला पोहोचते. १२ राज्यांतून जाणारी ही रेल्वे ७५ स्थानकांवर थांबते. याशिवाय भारतात कोणत्याही रेल्वेला इतक्या ठिकाणी थांबावे लागत नाही.

३ कटरा-मंगळुरू नवयुग एक्स्प्रेस : ही रेल्वे देशात तिसरी सर्वात लांबचा प्रवास करणारी आहे. ती जम्मू-कश्मीरमधील कटराहून मंगळुरूला पोहोचते. हा प्रवास ७२.५० तासांचा असून ३६७४ किलोमीटरचे अंतर कापते. ही रेल्वे १२ राज्यांत ६७ स्थानकांवर थांबते.

४ न्यू तिनसुकिया-बंगळुरू सिटी एक्स्प्रेस : ही रेल्वे आसाममधील न्यू तिनसुकियाहून निघून ६५ तास ५५ मिनिटांत ३६१५ कि.मी.चा प्रवास करून बंगळुरूला थांबते.

५ गुवाहाटी-तिरुअनंतपूरम एक्स्प्रेस : आसाममधील गुवाहाटीहून निघून केरळमधील त्रिवेंद्रमपर्यंत जाते. या प्रवासासाठी ६४.१५ तास लागतात व ३५५२ किलोमीटरचा प्रवास घडतो. ५० स्थानकांवर ती थांबते.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे