शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

घरात मिळाली ५ कोटींची रोकड, ४ किलो सोनं, आता अटक टाळण्यासाठी माजी आमदारांनं केलं असं काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 22:41 IST

Haryana News: हरियाणामधील यमुनानगर येथील माजी आमदार दिलबाग सिंह यांनी ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने दिलेला अटकेचा आदेश रद्द करण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ईडीच्या ताब्यातून त्वरित सुटका व्हावी, अशी मागणी केली आहे.

हरियाणामधील यमुनानगर येथील माजी आमदार दिलबाग सिंह यांनी ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. ईडीने दिलेला अटकेचा आदेश रद्द करण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ईडीच्या ताब्यातून त्वरित सुटका व्हावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाच्या सिंगल बेंचने कुठलाही आदेश न देता रजिस्ट्रीला नियमानुसार योग्य पीठाकडे ही याचिका सूचिबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. 

उच्च न्यायालयाने सांगितले की, याचिकाकर्त्याने अटक आणि रिमांड आदेशांना रद्द करण्याची मागणी केली आहे. याचिकार्ता माजी आमदार आहेत. माजी आणि विद्यमान आमदार आणि खासदारांकडून त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व फौजदारी खटल्याचं रोस्टर हायकोर्टाच्या एका विभागीय खंडपीठाकडे सोपवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत हायकोर्टाच्या रजिस्ट्रीने या प्रकरणाकडे पाहावे आणि योग्य खंडपीठासमोर या प्रकरणाला सूचिबद्ध करावे.

दिलबाग सिंह यांना पाच दिवस चाललेल्या कारवाईनंतर ईडीने अटक केली होती.  ४ जानेवारी रोजी ईडीने हरियाणामधील करनाल, सोनीपत आणि यमुनानगर येथे एकाच वेळी धाडी टाकल्या होत्या. या कारवाईत माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरातून पाच कोटी रुपयांची रोख रक्कम, चार परदेशी हत्यारं, १०० हून अधिक मद्याच्या बाटल्या आणि ४ ते ५ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. आता दिलबाग सिंह यांनी ईडीने केलेल्या अटकेला हायकोर्टात आव्हान दिलं आहे. 

दिलबाग सिंह हे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. २००९ मध्ये दिलबाग सिंह यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तर २०१४ मध्ये ते पुन्हा जिंकले. मात्र २०१९ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.  

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHaryanaहरयाणा