शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राज्यसभेत ४७ टक्के, तर लोकसभेत ८२ टक्के कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 08:31 IST

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बुधवारी संस्थगित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बुधवारी संस्थगित करण्यात आले. वास्तविक संसदेचे कामकाज गुरुवारपर्यंत चालणार होते. या अधिवेशनात राज्यसभेत ४७ टक्के कामकाज पार पडले, तर राज्यसभेत ८२ टक्के कामकाज पूर्ण झाले. 

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या १३ सदस्यांना निलंबित करण्यात आल्याने सभागृहात पहिल्या दिवसापासून गोंधळ सुरू राहिला. तृणमूलचे सदस्य डेरेक ओब्रायन यांनाही मंगळवारी निलंबित करण्यात आले. रोजचा गोंधळ आणि त्यामुळे कामकाजातील व्यत्यय याबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. 

याउलट या प्रकाराला सत्ताधारी पक्षच जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला. आम्हाला विश्वासात न घेता कामकाज रेटण्याचा प्रयत्न सरकारने केला. कोणत्याही विषयावर चर्चा करायचीच नाही, असा सरकारचा प्रयत्न होता. त्यामुळे कामकाजात अडथळे आले, अशी टीका  विरोधकांनी केली. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांचा लोकशाहीवर विश्वासच नसल्याने त्यांनी सभागृहात कायम गोंधळ घातला, असा आरोप केला.  

१८ दिवसच काम

या अधिवेशनाचा एकूण कालावधी २४ दिवसांचा असला तरी प्रत्यक्ष कामकाज १८ दिवसांचे होते. अधिवेशनात लोकसभेमध्ये १२ व राज्यसभेत १ अशी १३ विधेयके मांडण्यात आली. त्यात मतदान ओळखपत्र आधारला जाेडण्याविषयीचे, तसेच मुलींच्या विवाहाचे वय २१ करण्यासाठीचे अशी दोन विधेयके अत्यंत महत्त्वाची होती. त्यापैकी मतदान ओळखपत्र आधारला जोडण्याबाबतचे विधेयक दोन्ही सभागृहांत संमत करण्यात आले. 

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभा