शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 06:42 IST

उष्मा-संबंधित आजार आणि त्यामुळे झालेले मृत्यूंचा केंद्र सरकार लेखाजोखा ठेवत असते.

नवी दिल्ली : यावर्षी प्रचंड उष्णतेमुळे उत्तर भारतात तापानाचा पारा उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या ३ महिन्यांत ५६ पुष्टी झालेल्या उष्माघाताच्या मृत्यूंची नोंद झाली आहे, त्यापैकी ४६ लोकांचा मृत्यू एकट्या मे महिन्यात झाला आहे. या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात सर्वाधिक १४ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर या यादीत महाराष्ट्र (११), आंध्र प्रदेश (६) आणि राजस्थान (५) यांचा समावेश आहे. 

उष्मा-संबंधित आजार आणि त्यामुळे झालेले मृत्यूंचा केंद्र सरकार लेखाजोखा ठेवत असते. भारतीय हवामानशास्त्र विभागच्या (आयएमडी) मते एप्रिल महिन्यात ५ ते ७ तारखेदरम्यान पूर्व आणि आग्नेय भारतामध्ये दोन तीव्र उष्णतेच्या लाटांचा प्रभाव होता; या तीव्र उष्णतेच्या लाटा १५ आणि ३० एप्रिल दरम्यान ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि दक्षिण भारतापर्यंत विस्तारल्या.

आयएमडीनुसार उष्णेतच्या लाटांचा दुसरा टप्पा १६ ते २६ मे दरम्यान होता. या उष्णतेच्या लाटेमुळे राजस्थानमध्ये तापमान ५० अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले. तसेच दिल्ली-एनसीआर भागात ५ ते ७ दिवस उष्णतेची तीव्र लाट होती. दक्षिण हरयाणा, नैऋत्य उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये या लाटांमुळे कमाल तापमान ४४ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे या उन्हाळ्याच्या मोसमात ४ ते ८ दिवस उष्णतेची लाट अपेक्षित असते.

“उष्णतेच्या काळात, पूर्व भारतातील किनारी भागात सापेक्ष आर्द्रता ५० % पेक्षा जास्त आणि वायव्य भारतात सुमारे २० ते ३० % होती. याचा आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. यावर्षी मोठ्या संख्येने लोक तीव्र उष्णतेने प्रभावित झाले, असे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात