शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

२०५० मध्ये भारतातील ४५ कोटी तरुण लठ्ठ? वाढत्या फास्ट फूडमुळे गंभीर संकट उभे ठाकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 08:48 IST

चीन, भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : फास्ट फूड खाण्याचे वाढते प्रमाण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदय, मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणाच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाची समस्या अशीच वाढत राहिली तर २०५० पर्यंत जगभरातील २५ वर्षांवरील सुमारे ३८० कोटी तरुणांचे वजन जास्त असेल. ही संख्या त्यावेळच्या जगातील तरुणांच्या अंदाजे निम्म्याहून अधिक असेल, असे लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधन म्हटले आहे.  

अहवालानुसार चीन, भारत आणि अमेरिका या तीन देशांमध्ये लठ्ठपणाची समस्या सर्वाधिक आहे. २०५० पर्यंत, भारतातील २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लठ्ठ लोकांची लोकसंख्या सुमारे ४५ कोटींवर पोहोचेल. सध्या ही संख्या १८ कोटींच्या आसपास आहे.

फास्ट फूडच्या सेवनात वाढ

कॅमेरून, व्हिएतनामसह भारतातही फास्ट फूडचा वापर वाढत आहे. या गोष्टी खाणे लठ्ठपणाचे मोठे कारण बनत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

महिलांमध्ये समस्या अधिक

पुरुषांपेक्षा (सुमारे १०० कोटी) महिला (१११ कोटी) अधिक लठ्ठ  होत्या.  त्यामुळे महिलांना जीवनशैलीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.

टॅग्स :Healthआरोग्य