शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

सौदीत ४५० भारतीय कामगार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 06:12 IST

बेरोजगारी, कामाच्या परवान्याची मुदत संपल्याने भीक मागण्याची वेळ

हैदराबाद : कोविड-१९ च्या साथीचा सौदी अरबियातील भारतीय कामगारांनाही फटका बसला असून बेरोजगारीमुळे आणि कामाच्या परवान्याची मुदतही संपल्याने ४५० भारतीय कामगारांवर जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली. तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, काश्मीर, बिहार, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, पंजाब आणि महाराष्टÑातील कामगारांच्या कामासाठीच्या परवान्याची मुदत संपल्याने जगण्यासाठी त्यांना भीक मागून जगण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

एका कामगाराने व्हिडिओत सांगितले की, माझ्या भावाचे निधन झाले असून आईची प्रकृती गंभीर आहे. मला भारतात पाठवा. डिटेन्शन सेंटरमध्ये रवानगी करण्यात आलेल्या कामगारात उत्तर प्रदेशचे ३९, बिहार १०, तेलगंणा ५ आणि महाराष्टÑ, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या प्रत्येकी चौघांचा समावेश आहे. सौदी अरबियात २६ लाख भारतीय काम करतात. यापैकी २.४ लाख भारतीयांनी भारतात परतण्यासाठी नोंदणी केली होती.यापैकी ४९,००० कामगार भारतात परतले आहेत, असे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते आणि एमबीटी नेते अजमद उल्लाह खान यांनी सांगितले की, मुदत संपल्यानंतरही वास्तव्य केल्यामुळे स्थानिक प्रशासनाने या भारतीय कामगारांची रवानगी स्थानबद्ध केंद्रात (डिटेन्शन सेंटर) केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्टÑमंत्री एस. जयशंकर, नागरी उड्डयनमंत्री हरदीप पुरी आणि सौदी अरेबियातील भारतीय राजदूत औसफ सईद यांना पत्राद्वारे या भारतीय कामगारांना केंद्र सरकराने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

जेद्दाहस्थित भारतीय महावाणिज्य दूतावासाने सांगितले की, वाणिज्य दूतावास आणि विदेश मंत्रालय आणि सौदी सरकारशी संपर्कात आहे. प्रवासी भारतीय साह्यता केंद्राने या कामगारांना भारतात आणण्यासाठी त्यांचे फोन नंबर, कुटुंबांचे पत्ते मागावले आहेत.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबिया