शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लाच घेतल्याप्रकरणी 45 पोलिसांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 13:16 IST

सहा पोलीस निरीक्षक, सात विशेष उपनिरीक्षक आणि 32 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.

पटना : बिहारची राजधानी पटनामध्ये लाच घेतल्याच्या आरोपाखाली 45 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. येथील महात्मा गांधी सेतूवरून अवजड वाहनांना जाण्यासाठी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांनी लाच घेतल्याचे प्रकरण आहे.

बिहारमध्ये पहिल्यांदाच लाच घेतल्याच्या आरोपाखाली इतक्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अमरकेश डी यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, छठ पूजा सुरू असताना महात्मा गांधी सेतूवर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, अवजड वाहन चालकांकडून पैसे घेऊन त्यांना जाण्यास परवानगी दिली. सोबतच वाहन चालकांकडून घेण्यात आलेली ही लाच वाटून घेण्यावरून पोलिसांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये सहा पोलीस निरीक्षक, सात विशेष उपनिरीक्षक आणि 32 पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक अमरकेश डी यांनी कारवाई केल्यानंतर सांगितले की, सीसीटीव्हीद्वारे चौकशी केली असता लाच घेतल्याचे दिसून आले. त्याआधारे प्राथमिक गुन्हा दाखल करण्याचे आणि जे पोलीस अधिकारी या प्रकरणात सामील आहेत, त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या महात्मा गांधी सेतूवर सर्व नवीन पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.

पोलीस विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, महात्मा गांधी सेतूवरून अवजड वाहनांना पार करताना लाखो रुपयांची कमाई होत होती. ती पोलीस आपापसात वाटून घेत होते. त्यामुळे या महात्मा गांधी सेतूवर वाहतूक कोंडी होत होती. मात्र, आता या कारवाईनंतर वाहतूक कोंडीची समस्या सुटेल असे सांगण्यात येते.

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिस