शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

महाराष्ट्रातील ४४ जुनी स्थानके चकाकणार! देशातील ५०८ स्थानकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:32 IST

रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संजय शर्मा -

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी देशातील ५०८ जुन्या रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रारंभ करणार आहेत. यात महाराष्ट्रातील ४४ जुन्या स्थानकांचा समावेश केला आहे. त्यांचा पुनर्विकास करून तेथे सिटी सेंटर व शॉपिंग मॉल विकसित केला जाणार आहे.

रविवारी सकाळी ११ वाजता पंतप्रधान रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचा एकाच वेळी प्रारंभ करीत असताना संबंधित लोकसभा मतदारसंघातील खासदार व केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या भागांतील रेल्वेस्थानकांवर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकाच वेळी एवढ्या रेल्वेस्थानकांवर हा कार्यक्रम आयोजित करून नवीन रेकॉर्ड केले जात आहेत. 

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनातील कक्षात भेट घेतली. वैष्णव यांनी सांगितले की, ५०८ रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासासाठी २४४७० कोटींची तरतूद केली आहे. 

‘अमृत भारत स्थानक’ योजनेंतर्गत देशातील १३०९ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे स्थानकावर शॉपिंग सेंटर, सिटी सेंटर...- या रेल्वेस्थानकांवर पुनर्विकासांतर्गत शॉपिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स, सिटी सेंटर उभारण्यात येतील. रेस्टॉरंट, दुकाने, शोरूम, जिम्नॅशियमसुद्धा येथे असतील.- पुनर्विकासासाठी महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील ५५, राजस्थानमधील ५५, बिहारधील ४९, मध्य प्रदेशातील ३४, आसाममधील ३२, ओडिशामधील २५, पंजाबमधील २२, गुजरातमधील २१, झारखंडमधील २०, आंध्र प्रदेशातील १८, हरयाणातील १५ व कर्नाटकमधील १३ रेल्वेस्थानकांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे