शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान निधीचे ४२ लाख अपात्र लाभार्थी; महाराष्ट्रात ४.४५ लाख अपात्र लोकांकडून ३५८ कोटी रुपयांची वसुली होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 08:56 IST

योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

नितीन अग्रवाल

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधीचा लाभ देशात ४२.१६ लाख अपात्र शेतकऱ्यांनी घेतला असून, त्यांच्याकडून सरकार २९,९२७ कोटी रुपये वसूल करणार आहे. महाराष्ट्रात असे ४,४५,४९७ जण अपात्र असून, ते सरकारचे ३५८ कोटी रुपये देणे लागतात. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मंगळवारी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार अनुदान योजनेचा लाभ एकूण ४२,१६,६४३ अपात्रांनाही दिला गेला. त्यांच्याकडून २९,९२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल केली जाणार आहे. यात सर्वात जास्त शेतकरी आसाम (८.३५ लाख), तामिळनाडू (७.२२ लाख), पंजाब (५.६२ लाख) आणि महाराष्ट्रातील (४.४५ लाख) आहेत. 

सुजय पाटील, हिना गावित, श्रीकांत शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील इतर काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना तोमर यांनी ही माहिती दिली. योजनेत महाराष्ट्रातील १.१४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यात १.१० कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांत सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात दिले गेले.  लाभार्थी शेतकऱ्यांना सरासरी सहापेक्षा जास्त हप्त्यांत सरासरी १२,५४५ रुपये मिळाले. नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची नावे राज्य सरकारे करतात.

कोणत्या जिल्ह्यातून किती शेतकरी?

अहमनगर (६.८६ लाख), सोलापूर (६.२० लाख), कोल्हापूर (५.४७ लाख), सातारा (५.२९ लाख ) आणि पुण्यातील (५.१४ लाख) सर्वाधिक शेतकरी योजनेचे लाभार्थी होते. ठाणे (१.१९ लाख), नंदूरबार (१.२८ लाख), पालघर (१.३१ लाख), रायगड (१.५२ लाख), गडचिरोली (१.५२ लाख) आणि सिंधुदुर्गच्या (१.५४ लाख) शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र