शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सीमेवरील ४०,००० नागरिकांना सोडावे लागले गाव; कुरापतखोर पाकिस्तानचा तोफमारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:20 IST

दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे.

दोन दिवसांपासून जम्मूला लागून असलेल्या सीमेवर कुरापतखोर पाकिस्तानने सातत्याने तोफमारा सुरू ठेवला असून, आतापर्यंत अनेक गावांतील ४० हजार नागरिकांना आपले गाव-घर सोडून जावे लागले आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून, गावे भयाण आणि ओस पडली आहेत. शाळा बंद पडल्या आहेत. शेतीची कामेही तशीच सोडावी लागली आहेत आणि गुरांनाही सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी लोकांना स्थलांतरीत व्हावे लागले आहे.१९७१ नंतर प्रथमच एवढा तोफमारा -एवढ्या मोठ्या प्रमाणात उखळी तोफांचा मारा होण्याची ही गेल्या दोन-तीन दशकांमधील पहिली वेळ आहे. पाकिस्तानकडून अशा प्रकारचा हल्ला १९६५ आणि १९७१ मध्ये आम्ही अनुभवला होता, असे सीमेवरील गावात राहणारे ८० वर्षीय यशपाल यांनी सांगितले.आणखी एक जवान शहीद-श्रीनगर : पाकिस्तानच्या गोळीबारात आणखी एक जवान शहीद झाला असून, या आठवड्यात ११ जण प्राणास मुकले आहेत. एका पोलीस अधिकाºयाने सांगितले की, पूंछ जिल्ह्यात मानकोट सेक्टरमध्ये एका चौकीवर तैनात असलेले जवान सी.के. रॉय शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झाले. त्यांना रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत केलेल्या हल्ल्यात जम्मू, कठुआ, सांबा, पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ११ झाली आहे. यात सैन्याचे तीन जवान शहीद झाले असून, बीएसएफच्या दोन जवानांसह सहा नागरिकांचा समावेश आहे.काश्मीरला ‘मैत्रीचा पूल’ बनवा-काश्मीरला ‘युद्धाचा आखाडा’ नव्हे, तर ‘मैत्रीचा पूल’ बनवा, असे आवाहन, जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदी व पाकिस्तानला केले आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे विकासाच्या गोष्टी करीत आहेत; पण दुसरीकडे काश्मिरात विपरीत घडत आहे. शाळा बंद असून, मुले घरात फसली आहेत. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.भारतीय उपउच्चायुक्तांना केले पाचारण; भारतानेच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा केला कांगावा-इस्लामाबाद : भारताने पाकिस्तानच्या सीमा भागातील गावांत गोळीबार केल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तथापि, पाकिस्तानने भारताचे उपउच्चायुक्त जे.पी. सिंह यांना पाचारण केले.विदेश मंत्रालयाच्या कार्यालयाने सांगितले की, दक्षिण आशिया विभागाचे महासंचालक मोहम्मद फैसल यांनी सिंह यांना पाचारण केले आणि भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याबाबत निषेध नोंदविला.त्यांनी म्हटले आहे की, २० आणि २१ जानेवारी रोजी भारतीय सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. यात ३३ वर्षीय एक पुरुष आणि २५ वर्षीय एक महिला यांचा मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक मुलगी जखमी झाली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानIndiaभारत