शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कांदा दरवाढीच्या भीतीने निर्यातीवर ४०% शुल्क, ३१ डिसेंबरपर्यंत शुल्क लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 05:56 IST

शेतकऱ्यांना फटका बसणार

योगेश बिडवई, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कांद्याचे दर वाढण्याच्या भीतीने केंद्र सरकारने शनिवारी निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर निर्यातशुल्क लागू असेल. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची पुरेशी उपलब्धता राहावी, यासाठी शुल्क लागू केल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे.

शेतकऱ्यांना फटका बसणार

गेल्या वर्षी झालेला अवेळी पाऊस आणि त्यानंतर लांबलेला उन्हाळा यामुळे कांद्याचा दर्जा घसरला. परिणामी वर्षभर शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळाला नाही. त्यातच आता निर्यात शुल्क लागू केल्यानंतर भाव घसरण्याची भीती आहे. त्याचा मुख्यत: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका बसेल.

का निर्णय?

उशिरा आलेल्या पावसाने खरिपाच्या कांद्याचे बाजारात ऑक्टोबरमध्ये आगमन होण्याची शक्यता. त्यामुळे कांद्याची टंचाई निर्माण होऊन भाव वाढण्याची भीती.

यंदा महाराष्ट्रात पावसाचे उशिरा आगमन झाल्याने नवीन कांदा उशिरा येणार आहे. त्यातच गेल्या वर्षी अतिवृष्टीने कांदा खराब झाला होता. उन्हाळ कांदाही आता खराब होत आहे. केंद्राचा निर्णय शेतीस मारक ठरेल. - बाळासाहेब क्षीरसागर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव

 

टॅग्स :onionकांदा